गडकरींनी पुरस्कारासह ५ लाखांचा निधी संकटग्रस्त कांदा शेतकऱ्यांसाठी दिला!

नितीन गडकरींना नाशिकच्या `सावाना`उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार प्रदान
Nitin Gadkari & Pranav Pawar at New Delhi
Nitin Gadkari & Pranav Pawar at New DelhiSarkarnama

नवी दिल्ली : जिल्ह्यातील (Nashik) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे (Farmers) दर वर्षी २२ हजार कोटींचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आयआयटी व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी सुश्रूत ग्रुपचे संचालक प्रणव वसंतराव पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केल्या.

Nitin Gadkari & Pranav Pawar at New Delhi
निवडणुकीसाठी इच्छुकांची धांदल, भाजपच्या गोटात मात्र सामसूम

श्री. गडकरी यांना ‘सावाना’ने आदर्श संसदपटू पुरस्कार दिल्ली येथे प्रदान केला. त्या वेळी हा निधी मी नाशिकसाठीच खर्च करू इच्छितो, असे सांगून स्वत:कडील साडेचार लाख रुपये असा पाच लाखांचा निधी त्यांनी श्री. पवार यांच्याकडे सुपूर्द केला. या निधीतून द्राक्ष व कांदा उत्पादकांसाठी संशोधन व मदतीचे काम पवार यांच्या नेतृत्वाखाली व्हावे, असे श्री. गडकरी यांनी सांगितले. निफाड तालुक्यातील प्रश्‍नांबाबत बुधवारी सुरेशबाबा पाटील यांच्यासह पवार यांनी बुधवारी गडकरी यांची भेट घेतली होती. त्याचा संदर्भ देत गडकरी म्हणाले, की नाशिक हा कांदा उत्पादन करणारा आघाडीचा जिल्हा आहे. येथील शेतकऱ्यांचे कांदा वाहतूक, साठवणीतील अडचणी, भावातील चढउतार, नैसर्गिक संकटे आदींमुळे दर वर्षी २२ हजार कोटींचे नुकसान होते.

Nitin Gadkari & Pranav Pawar at New Delhi
रस्ते, कामांच्या दर्जाबाबत तडजोड करू नका!

नाशिक, नगर, मनमाड, तसेच नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक सातत्याने अडचणीत येतात. नाशिक जिल्ह्यातून दर वर्षी सुमारे एक लाख कोटींची कृषी निर्यात होते. कृषी क्षेत्रातील कौशल्य, ज्ञान व तंत्राच्या वापरात हा जिल्हा पुढे असतो. या संदर्भात महाराष्ट्रात सहा ते सात ड्रायपोर्ट उभारण्याच्या सूचना दिल्याचे श्री. गडकरी यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, की नाशिकच्या कांदा उत्पादकांना मदतीची गरज आहे. लॅाजिस्टिक सुविधांद्वारे हे नुकसान कमी करता येईल.

या संदर्भात रिसर्च, इनोव्हेशन आणि साठवणुकीबाबत संशोधनासाठी आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी व्हाइट कोल या जातीच्या बांबूच्या बहुउपयोगी कांदा साठवण चाळी तयार कराव्यात. या चाळींवर सौरऊर्जा निर्मितीसाठी सोलर पॅनल बसवावेत. बांबूचे रॅक करावेत व त्यात कांदा साठवावा. त्यातून पाच ते दहा लाख टन कांदा साठवता येईल. दरम्यान, श्री. पवार यांनी याबाबत अभ्यास व पाठपुरावा करून सुश्रूत ग्रुपतर्फे पुढाकार घेऊ, असे या वेळी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com