
Ahmednagar Politics : देशभरातील छावणी परिषद निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. येत्या ३० एप्रिलला छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.
या पार्श्वभूमीवरच छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे आता छावणी परिषदेच्या निवडणुकीचे राजकारण तापणार आहे.
या पार्श्वभूमीवरच अहमदनगरमधील भिंगार छावणी परिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे.
भिंगार छावणी परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच छावणी परिषदेच्या निवडणुकीची पूर्वतयारी करत कार्यकर्त्यांना आमदार जगताप यांनी मार्गदर्शनही केलं.
यावेळी जगताप म्हणाले, ''भिंगार छावणी परिषदेची निवडणूक आपण पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. यामध्ये सातही प्रभागात आपण उमेदवार निवडून आणू.
या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत. भिंगार शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मात्र, या निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी जनतेत जाऊन कामं करणं गरजेचं आहे, असं यावेळी ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर आता छावणी परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील मोठी रंगत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ही निवडणूक भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिंदे गट, ठाकरे गटासह सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.