भुजबळांच्या प्रयत्नाना यश; नव्या वर्षांत बेळगावला विमानसेवा

मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची छगन भुजबळ यांना पत्राद्वारे माहिती
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama

नाशिक : गेले काही दिवस राजकीय आरोप प्रत्यारोपाचा विषय झालेली नाशिक विमानसेवेबाबत छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याबाबत केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी भुजबळांना पत्र दिले आहे. सत्ताधारी खासदारांपेक्षा विरोधी पक्षाच्या प्रयत्नांना यश आल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

Chhagan Bhujbal
राज्यमंत्री भारती पवारांचा घणाघात; आमदार दिलीप बनकरांनी दिशाभूल थांबवावी!

याबाबत `आयमा`चे पदाधिकारी मनीष रावल यांनी माहिती दिली आहे. नाशिकची विमानसेवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने त्याबाबत नागरिकांकडून विचारणा होत होती.

Chhagan Bhujbal
धक्कादायक; पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांची आत्महत्या

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान २ वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी छगन भुजबळ यांना पत्र पाठवून नाशिक विमानसेवा पूर्ववत करण्याबाबत माहिती दिली आहे.

माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते की, भारत सरकारने टियर वन आणि टियर टू शहरांमधील हवाई संपर्क वाढवण्यासाठी उडान योजना सुरू केली आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत विविध क्षेत्रांच्या बोलीमध्ये नाशिक एचएएल विमानतळाचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार विविध विमान कंपन्यांकडून नाशिक विमानतळाला ९ शहरांचा पुरस्कार देण्यात आला. परंतु ३ वर्षांनंतरही विमान कंपन्यांनी आरसीएस उडान १ , उडान २, उडान ३ मधील बिडिंग दरम्यान प्रदान केलेल्या सेक्टर्समध्ये सेवा सुरू केल्या नाहीत म्हणून विविध कारणांमुळे उडान योजनेच्या उद्देशाला बगल दिली असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, अहमदाबाद आणि पुण्यासाठी एअर अलायन्स, अहमदाबादसाठी ट्रूएट आणि बेळगावसाठी स्टार एअरने या सेवा सुरू केल्या होत्या. परंतु ट्रूजेटने ऑपरेशन बंद केले होते. तसेच स्टार एअर नाशिकमधून ऑपरेशन्स स्थगित करत आहेत. यामुळे उडान योजनेच्या उद्देशाला आणखी धक्का बसणार आहे. त्यामुळे या विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान २ वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली होती.

याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी छगन भुजबळ यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, नाशिक विमानतळ अहमदाबाद, बंगलोरशी जोडणारे आरसीएस मार्ग बेळगाव, भोपाळ, गोवा, हिंडन, हैदराबाद आणि पुणे या निवडकांना पुरस्कार देण्यात आला. आरसीएस-उडान अंतर्गत एअरलाइन ऑपरेटर मेसर्स घोडावत यांनी आरसीएस उड्डाणे सुरू केली. मात्र नाशिक नाशिक ते बेळगाव प्रवासी वाहतूक सेवा मागणी आणि कमी प्रवाशांमुळे बंद करण्यात आलेली आहे. ही सेवा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून जानेवारी २०२३ पासून नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरु होणे अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आरसीएस मार्ग स्पाइसजेटद्वारे नाशिक ते हैदराबादला सेवा सुरू आहे. व्हीजीएफ शिवाय ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कार्यकाळ पूर्ण करणार्याह सर्व उडान मार्गांसाठी आरसीएस मार्ग किंवा नेटवर्कच्या सुरुवातीच्या तीन वर्षांच्या कालावधीचा अतिरिक्त एक वर्षाचा विस्तार, आधीच अनुकूल मानले गेले होते. मे.अलायन्स एअर ने ०१ फेब्रुवारी २०१९ रोजी नाशिक ते अहमदाबाद आणि हैदराबाद आणि २७ ऑक्टोबर २०१९ रोजी नाशिक ते पुणे आरसीएस उड्डाणे सुरू केली आणि त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ते ऑपरेट करू शकले नाहीत. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरु करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती मंत्री ज्योतिरादित्य एम, सिंधिया यांनी पत्राद्वारे छगन भुजबळ यांना दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in