Nashik News: नाशिक झाले यूपी- बिहार, पोलिसांचा वचक संपला?

गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त लाभल्याने पोलिसांवरही होतोय कुरघोडीचा प्रयत्न.
Criminals in Ambad
Criminals in AmbadSarkarnama

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीलगत (Ambad Industrial Area) दातीरनगरमध्ये नव्याने वसलेल्या दत्तनगर वसाहतीमध्ये कामधंद्यासाठी यूपी- बिहारमधून (Up & Bihar) आलेल्या परप्रांतीयांकडून गेल्या काही दिवसांपासून झुंडशाही करीत दहशत (Terror) माजविली जात आहे. गुंडगिरी करणाऱ्या या परप्रांतीयांना राजकीय वरदहस्त मिळत आहे. त्यामुळे नाशिकची कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. (Nashik city`s Law & Order became out of control)

Criminals in Ambad
Congress News: `फॉक्सकॉन`विषयी ९० टक्के चर्चा झाली होती!

या वाढत्या झुंडशाहीला वेळीच आवर न घातल्यास या परिसराचा यूपी- बिहार होऊन त्याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम नाशिककरांना भोगावे लागण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांसमोरही ही झुंडशाही मोडीत काढण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Criminals in Ambad
Nashik News: सीईओ अकार्यक्षम...जि. प. प्रशासन भगवान भरोसे!

रविवारी रात्री दातीरनगरमधील दत्तनगरमध्ये परप्रांतीयांच्या दोन गटामध्ये राडा झाला होता. त्याचा परिणाम गुंड प्रवृत्तीच्या या गटांनी दत्तनगरमध्ये खुलेआम हातांमध्ये लाकडी दांडके, हत्यारे घेऊन फिरताना रहिवाशांच्या घरांवर दगडफेक केली. सदर प्रकाराचा व्हिडिओ दोन दिवसांनी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंबड पोलिस खडबडून जागे झाले आणि याप्रकरणी दोन्ही गटाच्या सुमारे बारा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अंबड पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंतेश अनिल सिंग, मिंटू राजपूत, भगवान यादव, भोला यादव, टिंकू यादव, सुमीत सिंग, रवी राजपूत, राजेश राजपूत, श्रीकांत सिंग, शालुसिंग, प्रेम राजपूत, विशाल अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या दातीरनगर परिसरात दत्तनगरमध्ये मोठ्या प्रमाणात यूपी- बिहार या राज्यातून आलेला कामगार वर्ग राहतो. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडत आहेत. याबाबत काही नागरिकांनी अंबड पोलिसात तक्रार देत कारवाईचीही मागणी केली होती. त्यासंदर्भात पोलिसांकडून अद्यापपर्यंत कारवाई होत नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला अधिक बळ मिळून त्यांच्याकडून खुलेआम दहशत माजविण्याचे प्रकार सातत्याने केले जात असल्याचे सांगितले जाते.

राजकीय पाठबळ

काही दिवसांपूर्वी अंबड पोलिसांनी दत्तनगरमध्ये दहशत माजविणाऱ्या काही संशयितांना ताब्यात घेतले होते. या संशयितांविरुद्ध स्थानिकांकडून तक्रारी असताना त्यांना सोडविण्यासाठी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी पोलिस ठाण्यात पोचला. पोलिसांनी समज देऊन संशयितांना सोडले, परंतु संबंधित पदाधिकाऱ्याने दुसऱ्या दिवशी महिलांचे एक शिष्टमंडळ थेट पोलिस आयुक्तालयात पाठवून अंबड परिसरातील अवैध धंदे, महिलांची छेडखानी, वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध अंबड पोलिसांविरुद्ध तक्रारी केल्या. या प्रकारातून एका राजकीय पक्षाचा वरदहस्त असलेल्या या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्या राजकीय पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडूनही पाठबळ मिळत असल्याने हा ‘बारक्या’ पदाधिकारी परप्रांतीयांना हाताशी धरून दत्तनगर परिसरात गुंडांची दहशत माजवीत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पोलिसांचा वचक संपला?

गुन्हेगारीला आळा घालताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पाठबळ पोलिस ठाण्याला असावे लागते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गुन्हेगारीत वाढ झाल्याचे पोलिसांचा वचक संपला की काय, अशी शंका जागरूक नागरिकांकडून घेतली जात आहे. तर दुसरीकडे आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याने गुन्हेगार मुजोर होत असल्याचेच दत्तनगरमधील घटनेमुळे समोर आले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com