छत्रपतींबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपालांची जीभ झडली कशी नाही? : काँग्रेसचा संतप्त सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना पदावरून तात्काळ हटवा : नाना पटोले
Nana Patole-Bhagat Singh Koshyari
Nana Patole-Bhagat Singh Koshyari Sarkarnama

जळगाव : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी पुन्हा अवमानकारक वक्तव्य केले आहे. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपाल कोश्यारींची जीभ कशी झडली नाही? महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या दैवतांचा धडधडीत अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर केला आहे. (Immediately remove Governor Koshyari who insulted Chhatrapati Shivaji Maharaj : Nana Patole)

नाना पटोले यांनी जळगाव जिल्ह्यातील जामोद येथे पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल कोश्यारी व भाजपचे प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीचा खरपूस समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपचे नितीन गडकरी यांच्याशी करण्याचे पाप कोश्यारी यांनी केले आहे. आम्ही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन करणार नाही. या वादग्रस्त राज्यपालांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपच्या प्रवक्त्याने जे अकलेचे तारे तोडले आहेत, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाने माफी मागावी; अन्यथा भाजप नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

Nana Patole-Bhagat Singh Koshyari
राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक : कोश्यारींचे धोतर फाडणाऱ्यास लाखाचे बक्षीस; पुण्यात झळकले फ्लेक्स

निवडणुकीत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसून वारंवार त्यांचाच अपमान करता, ही सत्तेची गुर्मी आहे. राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आली आहे, असेही पटोले यांनी सुनावले.

Nana Patole-Bhagat Singh Koshyari
राष्ट्रवादी गटनेत्यावर प्राणघातक हल्ला; आमदार राऊतांच्या भावासह तिघांना कोठडी

काँग्रेसने मानले शिवसेना-राष्ट्रवादीचे आभार

काँग्रेसच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला असून या पदयात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा, नवा उत्साह, नवा जोश निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आगामी काळात चांगली कामगिरी करेल, त्यातून काँग्रेस पक्षाचे नवे रुप यापुढे दिसेल. भाजपाला जनता आता कंटाळली असून त्यांना पर्याय हवा आहे आणि काँग्रेसच योग्य पर्याय आहे, याची जनतेला खात्री आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाले, त्यांचे आभार. पदयात्रेत महिला व तरुणांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.

भारतीय जनता पक्ष ज्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बदनामी करणे थांबवतील, त्या दिवशी आम्हीही आरएसएस व भाजपबद्दल ‘सत्य’ सांगण्याचे बंद करू, असेही त्यांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com