'त्या वेळची इच्छा आदित्य ठाकरे आता पूर्ण करत आहेत; देव त्यांचे भले करो'

Aditya Thackeray : धरणगाव येथील सभेत शिवसेनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.
Aditya Thackeray, Gulabrao Patil
Aditya Thackeray, Gulabrao Patilsarkarnama

जळगाव : धरणगाव येथील सभेत शिवसेनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही गद्दार नाही तर खुद्दार आहोत असे पाटील म्हणाले. आम्ही जो प्रयत्न केला तो शिवसेना वाचवण्यासाठीच केला. मात्र, शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न त्यांना आवडलेला दिसत नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांची 'शिव'संवाद यात्रेच्या माध्यमातून आज गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव येथे सभा झाली. त्या सभेमध्ये शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर पाटील बोलत होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, शिंदे गटात जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी त्याची दखल घेतली असती तर आज ही वेळ आली नसती.

Aditya Thackeray, Gulabrao Patil
गुलाबरावांना टेन्शन देणारा आदित्य ठाकरेंचा दौरा : इमारतींच्या छतावरही गर्दीच गर्दी!

सर्वात आधी मी गेलो नाही. 32 आमदार गेल्यानंतर मी शिंदे गटात सहभागी झालो. मी एकटा नाही तर मी २० आमदार घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे तह करायला हवा होता. तह केला असता, तर ही वेळ आली नसती. आदित्य ठाकरे हे तरुण होते, त्यांनी मंत्री असताना अशाच पद्धतीने राज्यभर दौरे करायला हवे होते. अशी आमची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी तसे केले नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. मात्र, आमची त्यावेळची इच्छा आदित्य ठाकरे आता पूर्ण करत आहेत. त्यामुळे देव त्यांचे भले करो.

जे शिवसेना संपवायला निघाले आहेत, त्यांच्यासोबतच शिंदे गटाने युती केली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सभेत केली होता. यावरही पाटील यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आणि शिवसेनेची युती तोडली होती. त्या खडसेंसोबत तुम्ही बसले, असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांच्यावर केला.

Aditya Thackeray, Gulabrao Patil
आता उद्धव ठाकरेंचे फडणविसांना थेट उत्तर : मोदी पर्व संपलय, हे लक्षात ठेवा!

आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत युती केली तर आम्ही गद्दार काय.. नाही आम्ही खुद्दारच आहोत, असेही पाटील म्हणाले. हे सरकार कोसळणारच आहे, असे आदित्य म्हणाले होते. त्यावर पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हे सरकार शिवसेना व भाजप युतीचे सरकार आहे. याकडे त्यांनी त्याच दृष्टीने बघितले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com