शिवसेना हवी तर भाजपने मुख्यमंत्रीपदाचा विचार सोडावा!

रामदास आठवले यांनी नाशिकच्या दौऱ्यातयुतीबाबत भाष्य केले.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama

नाशिक : शिवसेना (Shivsena) आता अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची सुचना ऐकणार नाही. त्यामुळे भाजपने (BJP) उपमुख्यमंत्रिपद घ्यावे आणि शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असा नवा फॉर्म्युला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पुढे केला आहे.

Ramdas Athawale
महाविकास आघाडीतील पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करणार!

नाशिक दौऱ्यावर आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजपर्यंत कुठेही अडवले गेले नाही. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. पंतप्रधानांची सुरक्षा ही त्या-त्या राज्याची घटनात्मक जबाबदारी आहे. त्यामुळे सभेला गर्दी नव्हती, म्हणून पंतप्रधान माघारी फिरले हा कांगावा चुकीचाच आहे. पंजाब सरकार पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विचार करण्यात कमी पडले. ती त्यांची चूकच आहे, असा दावा त्यांनी केला.

Ramdas Athawale
शिवसेनेचा संकल्प, एक लाख महिलांना रोजगार देणार!

रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, माजी नगरसेवक संजय भालेराव, युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे आदींसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. ते म्हणाले, की हवामान खराब झल्याने ते रस्त्याने गेले. परंतु काँग्रेस सरकारने आंदोलकांना रस्त्यातून हटविले नाही, हे जाणूनबुजून केले. पंजाब सरकारने मोदींच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

युतीचा आठवलेंचा फॉर्म्युला

शिवसेना आता अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद ऐकणार नाही. त्यामुळे भाजपने उपमुख्यमंत्रिपद घ्यावे आणि शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असा नवा फॉर्म्युला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सुचविला. उद्धव ठाकरे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे. अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यावीत, अशी मागणी आहे. कारण शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना भाजपसोबत जावे असे वाटते आहे. यापूर्वी शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग शिवसेनेसोबत केला होता. त्यामुळे आमचे घरोब्याचे संबंध आहेत. आम्ही ज्यांच्याबरोबर जातो त्यांची सत्ता येते, असा चिमटा काढत ते म्हणाले, की दलित पँथरचे पुनरुज्जीवन करणार असून, समाज एकसंध करण्याचा आमचा विचार आहे.

स्वबळाचा काँग्रेसचा निर्णय योग्यच

राज्यात काँग्रेसचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय योग्य आहे. मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचे पटत नाही. उलट या दोन्ही पक्षांसोबत निवडणुकांना सामोरे न जाता स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्यच आहे. असे असले तरी राज्यात काँग्रेसला त्याचा जास्त फायदा होणार नाही. काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. मुंबई महापालिका निवडणूक रिपाइं स्वबळावर लढणार असल्याचा दावा करतानाच त्यांनी, पाच राज्यांच्या निवडणुकीत रिपाइं भाजपसोबत प्रचार करणार असल्याचे सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com