Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांविरोधात सुरू केलेल्या सक्तीची वसुली व मालमत्ता लिलावाविरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बिऱ्हाड मोर्चाला सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांचा हा बिऱ्हाड मोर्चा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे.
या बिऱ्हाड मोर्चाला नाशिकच्या वणी येथील खंडेराव महाराज मंदिरामध्ये दर्शन घेऊन सुरवात झाली आहे. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. हे सर्व शेतकरी दादा भुसे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. जिल्हा बँकेने सुरू केलेली सक्तीची वसुली व मालमत्तेचा लिलाव थांबण्यात यावा, अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांची आहे.
याबाबत काल रविवारी दादा भुसे यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप तरी यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana)या मोर्चावर ठाम राहिली. जिल्हा बँकेने गरीब शेतकऱ्यांना वेठीस धरले असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
दरम्यान, कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडून जमीन वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच सर्व शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने व्याज आकारणी करण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केलीय. त्यामुळे आता यावर प्रशासन काय निर्णय घेतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.