होय, आम्ही ठरवून भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ दिला नाही!

कसला विश्‍वासघात? ही तर राजनिती! हा धर्मादाय दवाखाना नव्हे.
Girish Mahajan, Eknath Khadse
Girish Mahajan, Eknath Khadsesarkarnama

जळगाव : जिल्हा बँकेत कोणताही विश्‍वासघात केला नाही, ही तर राजनिती आहे. राजकारण हा धर्मादाय दवाखाना आहे काय? होय आम्ही ठरवून भाजपचा एकही येवू दिला नाही, तुम्हाला विश्‍वास होता, तर पळ न काढता संपूर्ण २१ उमेदवार उभे करायचे होते, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना लगावला आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (Ncp) बैठकित ते बोलत होते.

जिल्हा बँकेची झालेली निवडणूक, उपमुख्यमंत्री अजीत पवार याचा होणारा दौरा याबाबत चर्चा करण्यासाठी आज (ता. २७) आकाशवाणी चौकातील पक्षाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविद्रं पाटील होते. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, जिल्हा बँक संचालक गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल पाटील आदी उपस्थित होते.

Girish Mahajan, Eknath Khadse
आपल्या गुन्ह्याची शिक्षा आईला होणार नाही, याची काळजी भावना गवळींनी घ्यावी!

या वेळी बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले, जिल्हा बँक निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस एकट्याच्या बळावर विजयी होईल, असा आपल्याला विश्‍वास होता, आणि झालेही तसेच पक्षाचे तब्बल ११ संचालक निवडून आले आहेत. मात्र, आपण एकत्रीत निवडणूक लढविल्यामुळे तीन्ही पक्षाच्या निर्णयानुसारच बँकेत कामकाज करणार आहोत. जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने विश्‍वासघात केला, असे गिरीश महाजन म्हणतात. मात्र, हा विश्‍वासघात नाही, ही तर राजनिती आहे. राजकारण हा काही धर्मादाय दवाखाना नाही. तुमचा जर निवडणूक जिकांयचा विश्‍वास होता, तर तुम्ही निवडणुकीत पळ का काढला, तुम्ही सर्व २१ उमेदवार तयार ठेवायचे होते. परंतु आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यानेच तुम्ही पळ काढला. मी ठरवून भाजपचा एकही उमेदवार निवडून येवू दिला नाही. आपण अगोदरच सांगितले होते, कि त्यांचा एकही निवडून येवू देणार नाही. भाजपचे आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, खासदार उन्मेश पाटील, आदी भाजप नेत्यांचे अर्ज बाद झाले. नव्हते तरीही त्यांनी माघार घेतली याचा अर्थ त्यांना आपण निवडून येणार नाही याची खात्री होती.

होय, मी रावेरमध्ये चमत्कार केला

रावेर विविध कार्यकारी सोसायटीमध्ये कॉंग्रेसच्या जनाबाई गोंडू महाजन विजयी झाल्या, त्याबाबत बोलतांना खडसे म्हणाले, होय, या ठिकाणी आपण ठरवून चमत्कार केला. उमेदवार अरूण पाटील यांनी भाजपच्या पाठींब्यावर उमेदवारी असल्याचे जाहिर केले होते. विरोधी असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे ते निश्‍चिंत होते, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन यांनी पाठींबा दिल्याने त्यांच्या घरी मुलीचे लग्न असल्याने त्या तयारीत होत्या. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी आपण सांगितले, होते कि रावेर वि. का. सोसायटीत चमत्कार होईल. आणि तो चमत्कार काय असतो हे सर्वानी पाहिले आहे.

Girish Mahajan, Eknath Khadse
अजितदादा त्यावेळी मला म्हणाले होते, ‘हरभजनदेखील मॅच जिंकून देतो!’

आगामी निवडणुकीसाठी सज्ज

आगामी जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीबाबत बोलतांना खडसे म्हणाले, ही निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवायची कि स्वातंत्र लढवायची याबाबत पक्षाचे राष्ट्रीय स्तरावर निर्णय होइल. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने तयारी केली पाहिजे. आपण पक्ष सरकारमध्ये आहे, त्यामुळे सरकानेही पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे रहावे असे अवाहनही त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com