`इडी`चे अधिकारी जमिनीवर आले...अन्‌ ग्रामस्थांची मने जिंकली!

ताडे (ता.एरंडोल) येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना जमिनीवर मांडी घालून बसलेले सक्तवसुली संचालनालयचे सहआयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण व अन्य अधिकारी.
ED Officers at Tade Village
ED Officers at Tade VillageSarkarnama

अमळनेर : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील कार्यक्रमात आयएएस, आयआरएस अधिकारी यांनी खुर्ची, मानपान, सत्कार सोडून चक्क जमिनीवर भारतीय बैठक मारली. हे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले जात आहे. अन्‌ त्यात ‘डोक्यात हवा गेलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी या अशा आदर्श अधिकाऱ्यांकडून बोध घ्यावा’ असा सल्लाही नेटकरी देताना दिसत आहेत. (Officers seat with villagers on ground for discussion)

ED Officers at Tade Village
शिवसेनेचा लढा सत्तेसाठी नव्हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी!

एकीकडे आपल्या पाळीव कुत्र्याला फिरविण्यासाठी स्टेडियम रिकामे करणारे ‘आयएएस अधिकारी दांपत्य’ चर्चेत आले अन्‌ त्याची दखल घेत तडकाफडकी बदलीही करण्यात आली. सोशल मीडियावर ही घटना ट्रोल होत असतानाच चांगली बाबही नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही.

ED Officers at Tade Village
राणा दाम्पत्याला उद्देशून बाळासाहेब थोरात म्हणाले...

ताडे (ता. एरंडोल) येथे काही दिवसांपूर्वी लोकचळवळीतून जलसंधारणबाबत महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला आशिया खंडातील सर्वात मोठ्या व श्रीमंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयचे सहआयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार हे तिन्ही प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी गावात येणार होते, म्हणून गावकरी कमालीचे उत्साहात होते.

टेबल, खुर्ची, दिपप्रज्वलन, हार, फुले, शाली- श्रीफळ याची संपूर्ण तयारी केली होती. थोड्याच वेळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील व सक्तवसुली संचालनालयचे सहआयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण हे आले. गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्यांच्यासोबत उपसंचालक कपिल पवार हे देखील होते. सर्वांच्या नजरा त्या अधिकाऱ्याकडेच होत्या.

अन्‌ घडले अजबचं

पाहुणे मंडळी मंचाकडे गेलेत अन्‌ सरळ गावकऱ्यांसोबत मांडी घालून जमिनीवर बसले. ना शाल.. ना श्रीफळ... ना सत्कार... सर्वच औपचारिकता बाजूला ठेवली. ‘आयएएस’ व ‘आयआरएस’ अधिकाऱ्यांचा हा साधेपणा अन्‌ विनम्रपणाचा अनोखा ‘प्रोटोकॉल’ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अन्‌ हे पाहून पुन्हा टाळ्यांचा कडकडाट वाढला. चाळीसगाव तालुक्यात यशस्वी झालेली ‘मिशन ५०० कोटी जलसाठा चळवळ’ एरंडोल तालुक्यात पोहोचवण्यासाठी राजेश पाटील यांनी आपल्या जन्मभूमीत ही बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीतील फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com