देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर संतापले, म्हणाले, `त्यांना लाज वाटली पाहिजे`

भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज येथे आले होते.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

नाशिक : शिवसेना ही कसली स्वातंत्र्यवीर सावरकरांची वारसदार. ती कधीच त्यांची वारसदार होऊ शकत नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पक्षाचे सदस्य म्हणाले, माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का?. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, या शब्दांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपल्या संतापाला मार्ग करून दिला.

Devendra Fadanvis
`इतनी अंधेरी न थी रात, पहले लिख’

शहरात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात सुरवातीपासूनच भाजपच्या नेत्यांनी विविध मार्गाने आपली नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज येथे आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक देखील घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी साहित्य संमेलनाचे संयोजक तसेच शिवसेना दोन्हींवर चांगलाच संताप व्यक्त केला.

Devendra Fadanvis
फडणवीस पुन्हा नाराज! नाशिकमध्ये असूनही साहित्य संमेलनाला जाणार नाहीत...

श्री. फडणवीस म्हणाले, शिवसेना ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची कसली वारसदार आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. कारण दोन दिवसांपूर्वी राज्यसभेत बारा खासदारांचे निलंबन झाले, तेव्हा माफ़ी मागायला आम्ही सावरकर आहोत का असे शिवसेना सदस्य म्हणाले, हा निर्लज्जपणा आहे. कवी जावेद अख्तर यांच्यासारखे लोक एकांगी व कोणाच्या तरी प्रेरणेतून बोलतात. आशा लोकांनी पुरस्कार परत करून बघितले, टीका केली पण, लोक मोदींच्या मागे आहेत त्यामुळे ते नैराश्येत बोलत आहेत. याहून अधिक बोलू इच्छीत नाही. माझ्या मराठी साहित्य संमेलनाला खूप खूप शुभेच्छा.

ते पुढे म्हणाले, या साहित्य संमेलनात केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?. नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा आहे. साहित्य संमेलन, मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले आहे. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव असावेत. साहित्य नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले याचे मी स्वागतच करतो. मात्र केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून ते केले.

कुसूमाग्रजांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असा प्रश्न करून आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. त्यांचा मराठी सारस्वतांना पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? असा प्रश्न फडणवीस यांनी केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com