अपात्रतेची भीती, अन्‌ टक्केवारीसाठी नगरसेवक गेले

संजय सावंत म्हणाले लवकरच रिक्त जागांवर लवकरच नव्या नियुक्त्या.
Sanjay Sawant
Sanjay SawantSarkarnama

जळगाव : विकास कामांतून मिळणारी टक्केवारी, पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची भीती यामुळेच महापालिकेतील (Jalgaon) नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत फारसे बोलणे योग्य नाही, असा टोला शिवसेना (Shivsena) जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी लगावला आहे. जिल्ह्यातून जे शिवसेनेचे पदाधिकारी गेले आहेत. त्यांच्या जागेवर नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (New appointments on rebel Corporators of Shivsena)

Sanjay Sawant
धुळे शहराला अमृत योजनेंतर्गत २५० कोटी द्यावे

शिवसेना फुटीचा जळगाव जिल्ह्यालाही मोठा हादरा बसला आहे. जळगाव लोकसभा क्षेत्रातील जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा, येथील आमदार शिवसेना सोडून शिंदे गटात गेले आहेत. हे आमदार गुवाहाटी येथे असताना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. जळगाव येथे त्यांच्या नेतृत्वाखाली या आमदारांच्या निषेधार्थ मोर्चाही काढण्यात आला होता.

Sanjay Sawant
धुळे शहरात महापौर प्रदीप कर्पे ‘रिटर्न्स’

हे आमदार आपापल्या मतदार संघात परतल्यानंतर जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत प्रथमच दौऱ्यावर येत आहेत. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेत फूट सुरूच आहे. महापालिकेतील शिवसेनेला पाठिंबा देणारे सहा नगरसेवक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. याबाबतीत बोलताना संजय सावंत म्हणाले, शिंदे गटात गेलेल्या या नगरसेवकांना कुणाशीही प्रेम नाही, ते भाजपमधून आले तेव्हाही स्वार्थासाठी आले होते. आता ते शिंदे गटात गेले तेही स्वार्थासाठीच गेले आहेत.

श्री. सावंत म्हणाले, त्यांना विकास कामांचे कोणतेही सोयरसुतक नाही, त्यांना केवळ टक्केवारी हवी असते. त्याचसाठी ते इकडून तिकडे पक्षांतर करीत असतात. आता तर त्यांना अपात्रतेचीही भीती आहे. त्यामुळे त्यातून वाचण्यासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या गटात गेले आहेत. परंतु सहा जणांसाठी निर्णय वेगळा आणि उर्वरित लोकांसाठी निर्णय वेगळा असे होत नाही. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होवू शकते.

बैठकीतून नवीन नियुक्त्या

जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा या विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. त्या ठिकाणी नवीन नियुक्तीबाबत बोलताना सावंत म्हणाले, की आपण आता तालुकानिहाय बैठका घेत आहोत, ज्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला आहे, त्या ठिकाणी आपण शिवसैनिकांतूनच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहोत. बैठकीत शिवसैनिकांची संमती घेवूनच या नियुक्त्या करण्यात येतील. येत्या काही दिवसात पालिका व जिल्हा परिषद निवडणुका आहेत. त्यात यश मिळविण्याच्या दृष्टीने आपण बैठकीत शिवसैनिकांशी चर्चा करणार असल्याचेही श्री. सावंत यांनी सांगितले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com