Chhagan Bhujbal News; एकनाथ शिंदे यांनी आता थांबलेलंच बरं!

एकनाथ शिंदे हे तर निमित्त...भाजप शिवसेना संपवायला निघाली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : (Nashik) कोणत्याही गोष्टीची सीमा असते. तारतम्य बाळगावं लागतं. शिवसेनेतील (Shivsena) वाद बांधावरच्या वादाच्या स्तराला गेला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता थांबलं पाहिजे. कारण सामान्य नागरिक देखील म्हणतात, शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackerey) यांचीच आहे, या शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिवसेनेतील सद्याच्या वादावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. (Chhagan Bhujbal criticize Eknath Shinde on his political steps)

निवडणूक आयोगाने शिवसेना व नाव व चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाने शिवसेनेच्या कार्यालयांचा ताबा घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या वादावर श्री. भुजबळ यांनी आपली प्रतिक्रीया दिली.

Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना इकडे आड तिकडे विहीर; आता मशाली'वरुन समता पक्ष आक्रमक

ते म्हणाले, कोणत्याही वादात किती टोकापर्यंत जायचे याला सीमा असते. त्याबाबत काही तारतम्य पाळावे लागते. सध्या तसे होताना दिसत नाही. कारण सामान्य शिवसेना कार्यकर्ताच नव्हे तर सामान्य नागरिक देखील शिवसेना कोणाची हे स्पष्टपणे सांगतो. शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी एक सीमा निश्चित केली पाहिजे. कुठं थांबायचे हे ठरवले पाहिजे.

शिंदे गटाकडून शिवसेना ठाकरेंच्या कार्यालयावर ताबा घेण्याचे काम सुरु आहे. शिवाय शाखा, कार्यालय ताब्यात घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या वादावर भुजबळ यांनी शिंदे गटाच्या धोरणावर टिका केली.

ते म्हणाले, गेले काही दिवस सुरु असलेले राजकारण पाहता अजूनही सहानुभूती उद्धव ठाकरे यांनाच आहे, हे या शिंदे गटाला का लक्षात येत नाही. सामान्य नागरिक देखील सांगतो की, शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आहे. मग हे शिंदे गटाच्या लक्षात येत नाही का?. शिंदे गटाने आता थांबले पाहिजे. शेतकऱ्याच्या बांधाला बांध असताना जशी मारामारी चालते, तसे इथे सुरू आहे?. कार्यकर्ते, नागरीकांनी हे बघायचं का? असा सवाल त्यांनी केला.

Chhagan Bhujbal
Sanjay Raut : ''...नाहीतर रस्त्यावर पवार…पवार ओरडत फिरायची पाळी आपल्यावर येईल!''; मनसेचं राऊतांना पत्र

न्यायालयावर विश्वास...

न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यासंदर्भात थोडाफार विश्वास न्यायालयावर आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर आहे. त्यांनी लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करावी. रोज सुनावणी होतेय, दोन पक्ष झाले. पण आता सर्वच ते घेऊन जात आहेत. उद्या मातोश्री ही बाळासाहेब ठाकरे यांची बसण्याची जागाही घेऊन जातील, हे आता थांबायला पाहीजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com