Nashik News: विमानसेवेसाठी आदित्य ठाकरे यांनी घेतला पुढाकार!

Aaditya Thackeray News: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंशी पत्रव्यवहार करत समस्या सोडविण्याची मागणी केली.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेचे (Shivsena) युवानेते व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी नाशिकच्या (Nashik) विमानतळाबरोबरच हवाई समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांच्याकडे मध्यस्थी केली आहे. (Thackeray deemands to resolve aviation issues of Maharashtra)

राज्यातील इतर महत्त्वाच्या विमानतळांबरोबरच नाशिकच्या विमानसेवेचे प्रश्‍न सोडविल्यास प्रगतीतील अडथळे दूर होतील, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

Aditya Thackeray
Chandrakant Khaire News : नामांतराला विरोध आहे, तर मग न्यायालयात जा, आंदोलनाची नौटंकी कशाला ?

गेल्या वर्षी जूनमध्ये राज्यात सत्तांतरण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला. निवडणूक आयोगाने, तर शिवसेना नावासह चिन्हदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिले. त्यानंतर शिवसेना ही सत्तेत किंवा सभागृहात नाही, तर लोकांमध्ये असल्याचे सांगत उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात जाहीर सभांचा धडाका सुरू केला.

स्थानिक प्रश्‍नांना वाचा फोडत ते प्रश्‍न शासनदरबारी सोडवण्यासाठी पाठपुरावही सुरू केला. गेल्या महिन्यात आदित्य ठाकरे यांचा नाशिक व मालेगाव दौरा झाला. त्या वेळी ‘आयमा’च्या एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी विमान सेवेसंदर्भातील समस्या त्यांच्याकडे मांडल्या. विमानसेवा सुरू झाल्यास नाशिकच्या विकासाला चालना मिळेल, असे साकडे त्यांना घालण्यात आले.

Aditya Thackeray
Nashik News: केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी देणे घेणे नाही!

त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी नाशिकच्या विमानसेवेसंदर्भात पत्रव्यवहार करून समस्या सोडविण्याची मागणी केल्याने स्थानिक प्रश्‍नांवर ठाकरे पिता-पुत्र मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

विमानतळाचा प्रश्‍न सोडवा

नाशिकचे ओझर विमानतळ हा महाराष्ट्रासाठी आणखी एक मोठा त्रासदायक प्रश्‍न आहे. नाशिक हे पवित्र शहरांपैकी एक आहे, ज्यास पुण्यासारखाच समृद्ध वारसा आहे आणि विमानतळ कनेक्टिव्हिटीसह वापरण्याची मोठी क्षमता आहे. विमानतळामध्ये सर्व सुविधा आहेत, ज्यासाठी ते जागतिक दर्जाचे बनवणे आवश्यक आहे, तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये नाशिकला उर्वरित भारत आणि जगाशी जोडणाऱ्या उड्डाणांची संख्या कमी करण्याचा अन्यायकारक पक्षपातीपणा दिसून आला आहे. त्यामुळे नाशिकला न्याय द्यावा आणि देशाच्या इतर भागांत विमानसेवा सुरू करावी. नाशिकच्या विमानसेवेचा संबंध उद्योग, कृषी, पर्यटन वाढीशी असल्याने समस्या सोडवावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com