मातोंडकर-उपाध्ये आमने सामने : १२ आमदार नियुक्तीच्या प्रश्नाचा किस

12 MLA | Urmila Matondkar | Keshav Upadhye | १२ आमदारांच्या यादीत उर्मिला मातोंडकरांचे नाव असल्याच्या चर्चा
Urmila Matondkar | Keshav Upadhye
Urmila Matondkar | Keshav Upadhye Sarkarnama

मुंबई : मागील वर्षी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या (BJP) १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. सर्वोच न्यायालयाने (Supreme Court) आज त्या १२ आमदारांचे निलंबन रद्द ठरवून उद्धव ठाकरे सरकारला (Thackeray Government) चांगली चपराक लावली आहे. मात्र या प्रश्नावर महाविकास आघाडीने सावध भूमिका घेत हा प्रश्न विधीमंडळ अध्यक्षांच्या कोर्टात ढकलाल आहे.

या सोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्नही पुन्हा वरती आणला आहे. २ वर्षांनंतरही १२ आमदारांची नियुक्ती न करणे हे कितपत संवैधानिक आहे, असा प्रश्न 'मविआ'च्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. यावर भाजपकडूनही जोरदार प्रत्यूत्तर दिले जात आहे. या प्रश्नावर बोलताना शिवसेनेच्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांच्याच जोरदार ट्विटर वॉर रंगले आहे.

Urmila Matondkar | Keshav Upadhye
मोदी-शहांच्या राज्यात भाजप मालामाल; काँग्रेसवर मात्र कर्जाचे ओझे

उर्मिला मातोंडकर यांनी आज सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर दिले. त्या म्हणाल्या, अभिनंदन! आनंद आहे “लोकशाही” वाचली याचा. पण अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासुन राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती झालेली नाही. त्यावरही शोभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा. इथे फक्त ५० लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम १२ कोटींपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे, असेही मातोंडकर म्हणाल्या.

यानंतर मातोंडकर यांना यावर प्रत्यूत्तर देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये मैदानात उतरले. मातोंडकर यांना ते म्हणाले, थोडी माहिती घ्या आपलं वाचन चांगल आहे असं ऐकून आहे. दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका. आमदारांना सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून निलंबित करण्यात आले होते. राहिला तुमच्या आमदाकीचा विषय तर त्यासाठी लोक न्यायालयात गेली होती, पण न्यायालयाने काही सांगितलं नाही.

उपाध्ये यांच्या या टीकेवर उत्तर देताना मातोंडकर म्हणाल्या, अर्थातच विषय पुर्णतः वेगळे आहेत म्हणूनच “आनंद/अभिनंदन”. पण प्रश्न मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्कांचा आहे, आणि लोकशाहीचा तर आहेच आहे. त्यामुळे “वडाची साल” ऐवजी “आपला तो बाब्या” जास्त बरोबर आहे. माझ्या आमदारकीची चिंता नसावी. त्याने माझे काम थांबलेले नाही, असा टोलाही मातोंडकर यांनी उपाध्ये यांना लगावला.

या टोल्यावर प्रत्यूत्तर देताना उपाध्ये म्हणाले, आपली जळजळ, तळमळ ही केवळ 'आमदारकी'साठीच आहे, हे आपल्या ट्विटवरून लक्षात येतेच. महाराष्ट्रात एवढे गंभीर विषय घडत असताना, आपण त्यावर फारसे भाष्य केलेले दिसत नाही. पण आमदारकीचा विषय आला, की आपल्यातील 'प्रतिक्रियावादी' भूमिका सगळे काही स्पष्ट करते. बाकी आमदारकीसाठी शुभेच्छा, असे त्यांनी उपहासात्मक ट्विट केले.

यावर पुन्हा मातोंडकर यांनी ट्विट करुन उत्तर दिले. त्या म्हणाल्या, गेली २ वर्ष “जळजळ, तळमळ” आणि “जळफळाट” हे शब्द कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला माहित आहे. मुद्दा सोडुन बोलण्यात तथ्य नसते. मुद्दा लोकशाहीचा, लोकहिताचा आहे.

बाकी माझ्या जळजळीकरता अॅन्टासिड आहे, आपण आपला विचार करा, असे त्यांनी उपाध्ये यांना सुनावले. एकूणच या दोघांनीही आज १२ आमदारांच्या निलंबनावरुन १२ आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर येत त्या प्रश्नाचा किस पाडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com