Ajit Pawar On SC Hearing: ''...तोपर्यंत शिंदे फडणवीस सरकारला धोका नाही!''; अजित पवार असं का म्हणाले?

Supreme Court Verdict On Maharashtra Political Crisis: '' घटनाबाह्य सरकार, अमूक सरकार तमूक सरकार. जरी म्हणायला तसं असलं तरी...''
Ajit Pawar On SC Hearing
Ajit Pawar On SC HearingSarkarnama

Nashik : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी मार्च महिन्यात पूर्ण झाली. या सुनावणीवेळी ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपआपला युक्तिवाद पूर्ण केला. यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. मागील काही दिवसांपासून हा निकाल येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. हा निकाल आज (दि.११) दिला जाणार आहे.

याच धर्तीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

Ajit Pawar On SC Hearing
Cm Shinde On Abhimanyu Pawar : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीकडूनही पवार यांच्या उपक्रमाचे कौतुक..

अजित पवार(Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, '145 आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे, असं म्हणण्यात अर्थ नाही. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, त्यांना निर्णय देण्याचा पूर्ण अधिकार आहे. 16 आमदारांचा मुद्दा ते विधानसभा अध्यक्षांकडे पाठवतील असं मला वाटतं. विधिमंडळातील ही बाब आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडेच हे जाईल, अशी शक्यता नाकारता येत नाही' असं अजित पवार म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

ज्या दिवसापासून केस दाखल केली, तेव्हापासून चर्चा चालू आहे. ही गोष्ट जूनमध्ये घडली. आज जवळपास मे महिना आहे. बहुतेकजण म्हणत होते की मे महिन्यात सुट्या लागतात. त्याआधी याबद्दलचा निकाल लागेल. त्यानुसार आता निकाल येतोय”, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar On SC Hearing
Sanjay Raut on Maharashtra politics: सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे सूचक ट्विट; 'काय झाडी ,काय डोंगर...'

'हा' निकाल येण्याची शक्यता...

अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालया(Supreme court)चा निकाल काहीही लागला तरी माझं स्वत:चं मत असं आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालय हेच सर्वोच्च आहे. त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. घटनेनं त्यांना तो दिला आहे. त्यामुळे ते विचार करतीलच. पण कदाचित हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मी काही मोठ्या वकिलांशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं आलं की, यासंदर्भात बहुतेक विधिंमडळातली ही बाब आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडूनच त्यांनी माहिती घेऊन निकाल द्यावा अशी शक्यता नाकारता येत नाही असं मत पवार म्हणाले.

''आत्याबाईला मिशा असत्या तर...?''

तसेच राज्यातील सत्तासंघर्षावर होत असलेल्या राजकीय नेतेमंडळींच्या प्रतिक्रियांवर 'आत्याबाईला मिशा असत्या तर, याला काय अर्थ आहे? 145 चं बहुमत त्यांच्याकडे आहे. खूप जणांनी वेगवेगळी वक्तव्य केली. घटनाबाह्य सरकार, अमूक सरकार तमूक सरकार. जरी म्हणायला तसं असलं तरी अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. ते सरकार चालवत आहेत, निर्णय घेत आहेत.

Ajit Pawar On SC Hearing
ED Notice to Jayant Patil: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 'ईडी'ची नोटीस

मुख्यमंत्री(Eknath Shinde)-उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत, त्याचा ते पुरेपूर वापर करत आहेत, हे आपण मागचे 11 महिने पाहत आलो आहोत अशी माहिती अजित पवारांनी दिली. तसेच १४५ आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही अशी स्पष्ट भूमिकाही अजित पवार यांनी व्यक्त केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com