MIM युतीवरून राष्ट्रवादीत मतभेद : जयंतरावांचा नकार तर सुप्रिया सुळेंकडून स्वागत

MIM | NCP | Shivsena | Jayant Patil | Sanjay Raut | Supriya Sule : संजय राऊत, जयंत पाटील यांनी MIM युतीचा प्रस्ताव नाकारला आहे
Jayant Patil - Imtiaz Jalil - Supriya Sule
Jayant Patil - Imtiaz Jalil - Supriya Sule Sarkarnama

मुंबई : MIM पक्षाने महाराष्ट्रात भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) युतीची ऑफर दिली आहे. ही ऑफर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष शिवसेनेने (Shivsena) धुडकावून लावल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) देखील एमआयएमची (AIMIM) ऑफर नाकारली आहे. एमआयएम समविचारी पक्ष आहे का? याचा अभ्यास करावा लागेल. सध्या लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कमी आहे. याशिवाय एमआयएम भाजपची (BJP) 'बी' टीम नाही हे आधी त्यांना सिद्ध करावं लागेल, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एमआयएमचा युतीचा प्रस्ताव सध्या तरी नाकारला आहे.

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या प्रस्तावाच स्वागत केले आहे. विकासाच्या मुद्यावर समविचारी पक्षांनी एकत्र येण्याने राज्याचे चांगले होणार असले तर ही बाब चांगलीच आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी एमआयएमच्या महाविकास आघाडीच्या युतीच्या प्रस्तावावर बोलताना व्यक्त केले. त्या बारामतीत माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी सुळे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही निशाणा साधला.

Jayant Patil - Imtiaz Jalil - Supriya Sule
'एमआयएम'-महाविकास आघाडी युती होणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले...

एमआयएमचा प्रस्ताव नाकारताना जयंत पाटील म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे अनेक उमेदवार हे अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत. त्याठिकाणी एमआयएमने लक्षणीय मत घेतली आहेत. त्यांना जर युती करायची असेल ते ती केवळ औरंगाबाद, महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी विचार करावा लागेल. त्यांना आधी त्यांच्या भडकाऊ विधानांवर आणि भाषणांवर ताबा मिळवायला हवा त्यानंतरच पुढचा विचार केला जाईल असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Jayant Patil - Imtiaz Jalil - Supriya Sule
"MIM'ने भाजपची 'बी' नाही हे सिद्ध करावं" : राष्ट्रवादीनेही धूडकावला युतीचा प्रस्ताव

आज सकाळी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही एमआयएमचा प्रस्ताव धुडकावला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आणि तीनच पक्षांचे राहिलं. यात चौथा, पाचवा याला काही अर्थ नाही. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर आणि आदर्शांवर चालणारे पक्ष आहेत. अशात जर कोणत्या पक्षाचा नेता औरंजेबाच्या कबरीवर जावून डोक टेकत असेल आणि ते महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे आदर्श होणार नाहीत. त्यामुळे युती होणार असल्याच्या सर्व अफवा आहेत, असेही स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com