म्हसवड : बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत राज्यातील आघाडीच्या सरकारने गेल्या ऑगष्ट महिन्यात हजारो शेतक-यांवर गुन्हे दाखल करुन ज्या केसेस केल्या, त्या सरकारने मागे घ्याव्यात. अन्यथा, पुन्हा एकदा मोठे आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
माण -खटावचे आमदार जयकुमार गोरे यांची भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल म्हसवड येथील नगरपालिकेसमोर त्यांचा नागरी सत्कार झाला. या कार्यक्रमात श्री. पडळकर बोलत होते. आमदार पडळकर म्हणाले, शेतक-यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले नाहीतर त्यासाठी आम्हाला मोठे आंदोलन उभा करावे लागेल आणि आम्ही आंदोलन केले की सरकारची पळता भुई थोडी होईल. हे तुम्हालाही माहिती आहे.
सध्याच्या आघाडी सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. आरोग्य खात्यातील परिक्षेत झालेला घोटाळा असेल त्याचा अद्यापपर्यंत निकाल ही लागला नाही. तो रद्दही केला नाही. भाजपच्या काळात पाच वर्षाच्या काळात एकाही शेतक-याचे विज कनेक्शन कट केले नाही. त्या काळात असलेल्या तीन वीज कंपन्या या कधीही तोट्यात नव्हत्या. पण, आता आघाडी सरकारच्या काळात शेतक-यांची वीज कट करून ही या वीज कंपन्या तोट्यात आहेत.
हे कशामुळे तर भ्रष्टाचारामुळे. सध्याची राजकिय परिस्थिती बघुन राज्याच्या सर्व नेतृत्वाने जयाभाऊंच्या गळ्यात ही जिल्हाध्यक्ष पदाची माळ टाकली आहे. पक्षाने जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासास ते नक्कीच पात्र ठरतील व जिल्ह्यात भाजपची ताकद नक्कीच वाढेल. त्यासाठी जयाभाऊंनी आगामी काळात राज्याच्या सर्व जिल्हाधक्षांमध्ये आपले सातारचे जिल्हाध्यक्ष पद कसे मोठे आहे, त्याचा ठसा उमटवावा. आगामी काळात तुम्हाला राज्याच्या कार्यकारिणीत जाण्याची संधी मिळावी, अशा शुभेच्छा आमदार पडळकर यांनी दिल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.