Politics : पुढचे पंतप्रधान कोण असावेत? याबाबत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोणता नेता न्याय देऊ शकतो? याबाबत त्यांनी भाष्य केलं असून त्यांच्या मनातील नावच शहाजी बापू पाटलांनी सांगितलं आहे.
''देशाला सध्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे. मोदी सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. पण भविष्यामध्ये पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता फक्त नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यामध्येच आहे'', असं शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत. शहाजी बापू पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना हे भाष्य केलं.
''सध्या सी व्होटरचा सर्व्हे समोर आला आहे. त्यामध्ये भाजप विरोधात जनमत असल्याचे म्हटले आहे. यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील हेच पुन्हा सांगितलं आहे. यावर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, ''भाजप (BJP) विरोधात जनमत आहे हे शरद पवारांनी त्यांचे व्यक्तिश: मत सांगितले आहे. पण आपल्याल ते मान्य नाही. भाजपच्या आणि पंतप्रधान मोदी यांच्या कारभाराबाबत जनता समाधानी आहे'', असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
तसेच यावेळी शहाजी बापू पाटील यांनी वंचित आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या युतीवर भाष्य केले. ते म्हणाले, ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रात्रंदिवस कष्ट करत आहेत. त्यामुळे शिंदे गटाला वंचित आणि शिवसेनेच्या युतीचा कुठेही फटका बसणार नाही.
आजपर्यंतचे सर्व सर्व्हे चुकीचे ठरले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत शिंदे आणि फडणवीसांच्या उमेदवारांना बहुमत मिळेल'', असंही ते म्हणाले. तसेच वंचित आणि शिवसेनेच्या युतीमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.