सातारा : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे खासदार संजय राऊतांची भाषा बोलत आहेत. ज्यांनी पक्ष, संघटना वाढविण्यासाठी योगदान दिले, संघर्ष करून प्रसंगी टोकाची भूमिका घेतली, अशा चाळीस आमदारांना पालापाचोळ्याची उपमा देणं योग्य नाही, असे मत माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत बंडखोर आमदारांना त्यांनी पालापाचोळ्याची उपमा दिली होती, याबाबत एकनाथ शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी त्याला प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोंडातून ४० आमदारांना पालापाचोळ्याची उपमा देणं योग्य नाही. या सर्व सामान्य आमदारांनीच शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी योगदान दिलंय, संघर्ष करत टोकाची भूमिका घेतली. एकुणच उद्धव ठाकरे साहेब हे खासदार संजय राऊतांची भाषा बोलत आहेत.
मी आजारीत असताना सरकार पाडण्याच्या हालचाली झाल्या, आदित्य ठाकरेही असेच बोलत आहेत. याविषयी देसाई म्हणाले, आमचे नेते एकनाथ शिंदे हे गट नेते होते. त्यांनी ही बाब उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली होती. त्रास होतोय, आमदार अस्वस्थ आहेत. पाच ते सहा वेळेस शिंदेसाहेबांनी ठाकरे साहेबांना ही बाब सांगितली होती. आमदारांची ही खदखद असूनही उद्धव साहेबांनी त्याकडे दूर्लक्ष केलं.
आम्ही ५० आमदारांनी मिळून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना वाचविण्याचे काम केलं आहे. बाळासाहेब हे युग पुरूष असून वंदनीय पुरूष असल्याने त्यांना एका कुटुंबापुरते सीमित करू नये, ते देशाचे हिंदू हृदयसम्राट आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.