
सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खान यांच्या कबर परिसरातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्यामुळे शिंदे, फडणवीस सरकारची अतिक्रमण हटविण्याची मोहिम फत्ते झाली आहे. पुरातन काळात जशी अफझल खान आणि सय्यद बंडाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाच्या पायथ्यावर बनवली गेली होती, त्याच पद्धतीची कबर दिसत असून हा परिसर अतिक्रमणमुक्त झाला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने एका दिवसांत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझल खानाच्या कबर परिसरातील अतिक्रमणे हाटवली. त्यासाठी सुमारे १८०० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यंत गोपनीयपध्दतीने ही मोहिम जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी राबवली. यामुळे प्रतापगड उत्सव समिती, हिंदूत्ववादी संघटनांच्या इतक्या वर्षाच्या मागणीला न्याय मिळाला आहे.
सुमारे एक एकर परिसरात झालेले हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे. आता त्याठिकाणी केवळ अफझल खान व सय्यद बंडा यांच्या दोन कबरीच शिल्लक राहिल्या आहेत. त्या कबरी भोवती हिरव्या रंगाच्या नेटने कडेने संरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त झाला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी म्हणाले की, अफझल खान कबर परिसरात एकएकर जागेत अतिक्रमण करण्यात आले होते. ते संपूर्ण अतिक्रमण जिल्हा प्रशासनाने पोलिससंरक्षणात पाडले आहे. यामध्ये १९ खोल्या दोन विश्रांतीगृहाचा समावेश होता. अफझल खान कबर परिसरात केलेलं अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.