
Satara Politics : राज्यपाल बदलाची प्रक्रिया दिल्लीत होत असते. त्यामुळे साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी दिल्लीत जाऊन बसावे. राज्यपालांविषयी निर्णय घेण्यास केंद्र सरकारला भाग पडावे, असा खोचक टोला सातारा जावळीचे भाजपचे (BJP) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी उदयनराजेंना लगावला.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज सातारा पालिकेत जाऊन घरपट्टी नगरपरिषदेकडून नियमबाह्यारीत्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रिया सुरू असून ही अन्यायकारक कर आकारणी त्वरीत थांबवावी यासाठी पालिका प्रशासनाला निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांबाबत सर्वांनीच जपून बोलले पाहिजे. अपमान, अवमान होईल अशी वक्तवे करू नयेत. इतिहासाची मोडतोड करून कुठेतरी वेगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच सगळ्याच पक्षाच्या पदाधिकारी, नेत्यांनी आपल्या बोलण्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे भाजप मधील ज्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत, त्यांना योग्य समज देतील.
राज्यपाल यांनी केलेल्या वक्त्यव्यावरून त्यांना बदलावे अशी मागणी होत आहे, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ते प्रयत्न सुरू ठेवले आहेत. श्री. फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणारे व जनतेच्या भावना जाणारे नेते आहेत. राज्यपाल बदलाची प्रक्रिया ही केंद्रातून होत असते, राज्य सरकारच्या अखत्यारीत हा विषय नाही. त्यामुळे आंदोलन करणारांनी दिल्लीत जाऊन बसावे, तेथून हालचाली करून राज्यपालांना बदलावे. साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यात काय अर्थ आहे, असा खोचक टोला त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.