Sharad Pawar News : 'मी बाबा आढावांना ५०-६० वर्षे ओळखतो'; ...तर ते त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत : पवारांनी स्पष्टच सांगितले

Ahmednagar News : कामगार कायद्याला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, शरद पवार यांचा आरोप
Baba Adhav, Sharad Pawar News
Baba Adhav, Sharad Pawar NewsSarkarnama

Sharad Pawar, Baba Adhav News : ''आज या ठिकाणी हमाल माथाडी महामंडळाचे अधिवेशन भरले. अनेक कायदे आलेत. कारखानदारी वाढली, दरवर्षी ती वाढते. अनेक हातांना त्यामुळे काम मिळते. ते काम देत असताना जो काम करणारा आहे त्याला कायद्याने संरक्षण आहे. मात्र, या कायद्याच्या संरक्षणावर हल्ला करण्याचे काम काही लोकांनी सुरू केलेले आहे. माथाडी हमाल कायदा या देशामध्ये महाराष्ट्रात सुरू झाला आणि आज या कायद्याने कष्टकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली,'' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

हमाल माथाडी महामंडळाच्या २१ वे राज्य अधिवेशन आज (ता.२१) अहमदनगर (Ahmednagar) येथे झाले. या अधिवेशनामध्ये शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. यावेळी शरद पवार म्हणाले, ''आज काही लोक असे आहेत की त्यांना माथाडी कायदा खुपतो आहे. आज मालक वर्गाची एक मानसिकता वेगळी झाली आहे. संपत्ती मिळवायची आणि ठेवायचा अधिकार फक्त आमचा आहे आणि कष्ट करणारी जमात ही तुमची आहे. कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवयाचे काम मालकांचे. त्यामुळे एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये करून आज काही लोक मालकांच्या नावाने एक वेगळा निकाल घेत आहेत.''

Baba Adhav, Sharad Pawar News
Sharad Pawar News : ...तर त्यांचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांचा इशारा

''तो निकाल त्यांना घेयचा असेल तर माथाडी कामगारांवर हल्ला करणे, त्यांना दुर्बल बनवणे ही भूमिका त्यांच्या मनामध्ये आहे. आज हा कायदा सुखासुखी झाला नाही. मला आठवते की, महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यावेळी मी नुकताच निवडून गेलो होतो. अण्णा पाटील, बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील असा अनेकांनी शक्ती पणाला लावली. मग गिरणी कामगार, माथाडी कामगार या सगळ्या लोकांची शक्ती तयार केली आणि त्यांच्यासाठी कायदा तयार करण्याचा निकाल घेतला. त्या कायद्याने तुमच्या जीवनात एक प्रकारची शाश्वती आली,'' असे पवार यांनी स्पष्ट केले.

Baba Adhav, Sharad Pawar News
Sharad Pawar News : कर्नाटकमध्ये एकजूट होऊ शकते; तर देशातील इतर राज्यांमध्येही... शरद पवारांनी वाढवले भाजपचे टेन्शन!

''मध्ये सरकार बदलले आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार आले. त्यांनी काय केले तर या राज्यातील ३६ जिल्हे एकत्र करून एक नवीन राज्यव्यापी मंडळ स्थापन करण्याची भूमिका घेतली. त्या कायद्याला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आजही तो कायदा काही प्रमाणात शिल्लक आहे. असे सांगितले जाते गुंडगिरी येथे आहे पैसे लुबाडण्याचे काम होते.

मी बाबा आढावांना ५०-६० वर्षे ओळखतो. उभ्या आयुष्यामध्ये कुणी गुंडेगिरी केली, कोणी पैसे लुबाडण्याचे काम केले तर बाबा आढाव कधीही त्यांच्या पाठीशी राहणार नाहीत व त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. गुंडगिरीचा आरोप करून सबंध माथाडी चळवळीला एक प्रकारे बदनाम करण्याचे काम काही लोकं करतील त्या सगळ्या लोकांच्या विरुद्ध तुम्हाला व आम्हाला उभे राहावे लागेल'', असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com