सातारा : केंद्र सरकारने पेट्रोलचे दर पाच रूपयांनी तर डिझेलचे दर दहा रूपयांनी कमी केले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. तसेच राज्य सरकारमधील प्रमुख नेते मंडळी एकत्र बसून लवकरच निर्णय करतील, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.
पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या दराबाबत सर्वसामान्य जनतेत नाराजीचे वातावरण आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारनेही इंधनाचे दर कमी करावे, त्यावर लावलेले कर कमी करावेत, अशी मागणी होत होती. काल रात्री ऐन दिवाळीत केंद्र सरकारने पेट्रोलचे दर पाच रूपयांनी तर डिझेलचे दर दहा रूपयांनी केले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे महाविकास आघाडी सरकारचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वागत केले आहे.
मंत्री देसाई म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोलचे दर पाच रूपयांनी तर डिझेलचे दर दहा रूपयांनी कमी केले आहेत. इंधनावरील कराची रचना पाहिली तर दुहेरी कर आहेत. केंद्राचे काही कर तसेच त्या त्या राज्यांचेही कर लावलेले आहेत. केंद्राने सरचार्ज लावला आहे, तो कमी करावा, अशी मागणी अनेक राज्यांची होती. त्यानुसार केंद्र सरकारकडून दिलासा मिळेल, असे वाटत होते. काल रात्रीपासून केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
आता राज्य सरकार काय भूमिका घेणार, याविषयी शंभूराज देसाई म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे तिघे एकत्र बसून त्यावर राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून माहिती घेतील. त्यानंतर मंत्रीमंडळाशी चर्चा करून योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.