पवारांच्या भाकिताला शहाजीबापूंचा थेट इतिहासातील संदर्भ; म्हणाले...

Sharad Pawar|Shahaji Patil|Shivsena : शिंदे-फडणवीस सरकार कधी कोसळणार ? या प्रश्नावर आमदार शहाजीबापू पाटलांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
Shiv Sena MLA Shahaji Patil & Sharad Pawar Latest News
Shiv Sena MLA Shahaji Patil & Sharad Pawar Latest NewsSarkarnama

Shahaji Patil : शिवसेनेचे (ShivSena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुमारे 40 आमदारांसह बंड केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळले होते. (Shiv Sena MLA Shahaji Patil & Sharad Pawar Latest News)

दरम्यान, शिंदे यांनी भाजपच्या समर्थनाने सत्ता स्थापन केली असून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. हे सरकार जास्त दिवस चालणार नाही, अस भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं यावर शिवसेनेचे शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून हे सरकार पूर्ण कार्यकाळ म्हणजे अजून अडीच वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी आज (ता.17 जुलै) 'साम' टीव्हीला मुलाखत दिली. यावेळी पाटलांनी आपले मत व्यक्त केलं आहे.

Shiv Sena MLA Shahaji Patil & Sharad Pawar Latest News
एकदा नाही तर लाख वेळा गद्दार म्हणेन, बांगरांमध्ये हिंमत असेल तर...

पवारांनी काही दिवसांपूर्वी हे सरकार जास्त दिवस चालणार नाही. मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा, असे भाकीत केलं होत. यावर शहाजीबापूंनी मुलाखती दरम्यान प्रत्युत्तर दिल आहे. पाटील म्हणाले, पवार जे बोलतात त्याच्या नेमके उलटं होत असते. तसेच आताही असेच होणार असून हे सरकार काही पडणार नाही. अजून अडीच वर्ष या सरकारला धक्का लागणार नसून आम्ही त्यासाठी जागे आहोत, असे त्यांच्या शैलीत ठणकावून सांगितले.

Shiv Sena MLA Shahaji Patil & Sharad Pawar Latest News
Aurangabad : मुख्यमंत्री शिंदे सत्तारांवर मेहरबान, सुतगिरणीसाठी १५ कोटी मंजुर..

शहाजीबापूंनी यावेळी बोलतांना इतिहासातील काही निवडणुकांचे संदर्भ दिले. ते म्हणाले, १९९५ मध्ये निवडणूक झाली तेव्हा पवारांनी राज्याचे नेतृत्व केलं होतं. तेव्हा ८० आमदार निवडून आले होते. हायकमांडने त्यावेळी सरकार बनवायचे नाही, असा निर्णय घेतला. त्यावेळी विधीमंडळाच्या पहिल्या बैठकीत पवार हे सरकार लवकरच पडणार असे म्हणत होते. त्यावेळीही १९९९ उजडले पण सरकार काही कोसळले नाही, आताही तसंच होणार, असे शहाजीबापू म्हणाले.

दरम्यान, शहाजीबापूंना गुवाहाटीमधे असतांना त्यांचा हॉटेलमधील फोनवरील संवादामुळे त्यांना राज्यात प्रचंड प्रसिध्दी मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे आता राज्यभराच लक्षं असत. याबरोबरच ते म्हणाले की, शिवसेना वाचवण्यासाठी शिंदे यांनी हे पाऊल उचलले आहे. आम्हाला महाविकास आघाडीत असतांना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी निधी दिला नाही. सर्व निधी हा राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला जात होता, असा पुन्हा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com