राहुल गांधींच्या 'भारत जोडो'साठी सतेज पाटलांचा 'मेगा प्लॅन'; यात्रा गावागावात पोहचवणार

कोल्हापुरात 'नफरत छोडो, भारत जोडो' अभियान
Rahul Gandhi, Satej Patil
Rahul Gandhi, Satej Patilsarkarnama

कोल्हापूर : काँग्रेसचे (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेल्या 'भारत जोडो' यात्रेची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक गावांत व्हावी. तसेच राहुल गांधी यांची ही पदयात्रा प्रत्येक गावांत दिसावी, यासाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने 'नफरत छोडो, भारत जोडो' अभियान सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज केली.

राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला पाठिंबा देण्यासाठी पाटील यांच्या पुढाकाराने आज ऐतिहासिक दसरा चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी पाटील बोलत होते. या अभियानाची माहिती सांगताना पाटील म्हणाले, 'या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावांत राहुल गांधी यांची यात्रा दाखवण्यासाठी १३ एलईडी व्हॅन तयार करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील १२०० हून अधिक गावांत या व्हॅन सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात फिरतील.

सकाळी एका गावांत तर सायंकाळी दुसऱ्या गावांत या व्हॅन जाणार आहेत. त्या गावांत राहुल गांधी यांची पदयात्रा दाखवण्यात येईल. यापुढील शंभर दिवस हा कार्यक्रम सुरू राहील. त्याचे नियोजन झाले आहे. गावनिहाय या अभियानासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

Rahul Gandhi, Satej Patil
दसरा मेळाव्यातून शिंदेंचा शक्तीप्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न; खरी शिवसेना ठाकरेंचीच

कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यात असे एकही गांव नाही ज्याठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, असे पाटील म्हणाले. गेल्या सात-आठ वर्षात देशात काय चालले आहे हे आपण सर्वजण बघत आहोत. देशात सत्तेवर असलेल्या भाजपकडून देश तोडण्याचे काम सुरू आहे, ते रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्‍मिर अशी 'भारत जोडो' यात्रा सुरू केली आहे.

१५० दिवस ही यात्रा देशातील विविध भागातून जाणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठीच हा मेळावा असून जिल्ह्यात ही यात्रा पाहता यावी यासाठी प्रत्येक गावांत एलईडी व्हॅनच्या माध्यमातून ती दाखवण्यात येणार आहे.

Rahul Gandhi, Satej Patil
विखे-पाटलांनी चौकशीचे आदेश देताच पाणी पुरवठा विभागाचे कार्यकरी अभियंता कोळी गेले रजेवर!

१५ ऑक्टोंबरपर्यंत नांव नोंदणी

राहुल गांधी यांनी सुरू केलेली ही यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यात जिल्ह्यातून किमान दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहे. त्यात मी स्वतः सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रहायची व्यवस्था नसेल, रस्त्यावर झोपावे लागेल, अशी तयारी असलेल्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे. ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी १५ ऑक्टोंबरपर्यंत काँग्रेस कमिटीत नांवे नोंदणी करावीत, असे आवाहन पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com