राजू शेट्टींनी सांगितले भोंगे वाजण्यामागचे कारण...

बळीराजा उध्दार यात्रेनिमित्त Baliraja Udhar Yatra माजी खासदार राजू शेट्टी Raju shetty आज कऱ्हाडला (जि.सातारा) Karad आले होते.
Raju Shetty
Raju Shettysarkarnama

कऱ्हाड : महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार अपय़शी ठरले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे अपयश यावर चर्चा नको म्हणुन हे राजकीय भोंगे वाजत आहेत, असे स्पष्टीकरण माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिले.

बळीराजा उध्दार यात्रेनिमित्त श्री. शेट्टी आज कऱ्हाडला (जि.सातारा) आले होते. त्यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. श्री. शेट्टी म्हणाले, ''शेतकऱ्यांवर गेल्या दोन वर्षात महापूर, कोरोनासह अनेक आपत्ती आल्या. त्यामध्ये पीक विमा योजना राबवणाऱ्या कंपन्या कर्जबाजारी होऊन दिवाळखोरीत निघाल्या पाहिजे होत्या.

Raju Shetty
बाप दाखव नाहीतर श्राध्द कर! शरद पवार कडाडले

मात्र, त्याच कंपन्यांनी हजारो कोटींचा नफा कमवला आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना फसवले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या अपयश यावर चर्चा नको म्हणुन हे राजकीय भोंगे वाजत आहेत, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com