Sadabhau Khot News : फडणवीसच महाराष्ट्रातून पवारशाही नष्ट करतील : सदाभाऊ खोत

Wari Shetkaryanchi कऱ्हाड (जि.सातारा) येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रेस आज प्रारंभ करण्यात आला.
Sadabhau Khot
Sadabhau Khotsarkarnama

-हेमंत पवार

Karad News : जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेणाऱ्या शरद पवारांनीच सहकारात गढ्या निर्माण करून त्यांच्या सरदारांनी गावगाड्यातील शेतकऱ्यांची लुट केली. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस त्याच्यासारखे दमदार नेतृत्व आहे, असे मी यशवंतरावांच्या समाधीच्या साक्षीने सांगतो. फडणवीसच महाराष्ट्रातून पवारशाही नष्ट करून लुटारूंचा बंदोबस्त करू शकतात, अशी जोरदार टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली.

कऱ्हाड (जि.सातारा) Karad येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून कऱ्हाड ते सातारा ‘वारी शेतकऱ्यांची’ पदयात्रेस आज प्रारंभ करण्यात आला. यावेळी सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी माध्यमांशी संवाद साधला. रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हाउपाध्यक्ष मुसद्दीक आंबेकरी, बापूराव जगदाळे, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

श्री. खोत म्हणाले, कऱ्हाडमधून साताऱ्यापर्यंत आम्ही गावगाढ्याचे प्रश्न घेवुन पदयात्रा काढत असून या तीन दिवसात सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देईल अशी आशा आहे. तीन दिवसात निर्णय झाला नाही तर आम्ही वाहनांने मुंबईला मंत्रालयावर धडक मारणार आहोत. ते म्हणाले, गेल्या ६० ते ६५ वर्षात मुठभर लोकांच्या हातात देशाचा, राज्याचा कारभार असल्याने सामान्य माणुस लुटला गेला आहे.

Sadabhau Khot
Satara News : नवउद्योजकांना ५५० कोटींचे अनुदान; युवकांनी रोजगार देणारे बनावे : उदय सामंत

शेतकरी विरोधी कायदे कॉंग्रेसच्या काळात बनले गेले. काळ्या कायद्यांना मुठमाती देवुन शेतकऱ्यांचे राज्य उभे रहावे ही भूमिका घेवुन आम्ही निघालो आहोत. कारखाने कोणाचे आहेत, साखर कारखानदारांचे नटसम्राट कोण आहेत ? हे महाराष्ट्राला माहीत आहे. दोन कारखान्यातील हवाई अंतर काढल्यास पत्याची पाने कोसळावी असे कारखानदारांचे गढ नाहीसे होतील.

Sadabhau Khot
Rahul Gandhi on Narendra Modi : नवीन संसदेच्या उदघाटनावरून काँग्रेसनं मोदींना घेरले; राहुल गांधींनी केली 'ही' मागणी

कारखानदार हे उंदरासारखे असून जहाज पुढे निघाल्यावर पहिल्यांदा तेच उडी मारतात आणि सरकार बुडायला लागल्यावर उडी मारणारी अवलादही साखर कारखानदारच आहेत. चव्हाण साहेबांच्या समाधीजवळ आम्ही पाप धुवायला आलो नसून तुमची पिलावळीने आम्हाला जरजर केल्याचे सांगायला आलो आहोत. मंत्रिपद मिळवायला नव्हे; तर शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आलो आहोत. शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवणारे काँग्रेसने केलेले कायदे संपुष्टात आणा, शेतकऱ्याना स्वातंत्र्य द्या, अशी आमची सरकारला मागणी आहे.

Sadabhau Khot
NCP Vs Congress : '' आघाडीत राष्ट्रवादीच मोठा पक्ष...''; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याची अजितदादांच्या विधानाला सहमती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com