
राहुरी / शिर्डी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात पक्षांतराचे वारे वाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. यामुळे शिंदे गटाचा भाजपला जोरदार दणका मानला जात होता. आता मात्र अहमदनगर जिल्ह्यातून कार्यकर्त्यांच्या पक्षांतराची मोठी घडामोड समोर येत आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे राष्ट्रवादीच्या तब्बल ५० कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादीला नगर जिल्ह्यात हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. यामुळे काही अंशी भाजपचे बळ वाढले आहे. आगामी स्ठानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचे भाजपात प्रवेश महत्त्वपूर्ण मानले जात आहे. आगामी निवडणुकीत या ठिकाणी भाजपचा वरचष्मा राहील, असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राहुरी मतदार संघात भाजपचे ताकद वाढले आहे. या मतदारसंघात पुन्हा भाजपचा आमदार निवडून येईल, असा विश्वास यावेळी विखे पाटलांनी व्यक्त केला. यावर अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रीया आली नाही. मात्र स्थानिक पातळीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष उभा राहण्याचे चिन्हे दिसत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.