Maharashtra Political News : 'फडणवीसांच्या वक्तव्याची चिंता मुख्यमंत्री शिंदे अन् त्यांच्यासोबतच्या चाळीस वीरांनी करावी'

Devendra Fadnavis News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis News
Eknath Shinde, Devendra Fadnavis NewsSarkarnama

Jayant Patil News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एका वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच आणि कसा येतो हे तुम्हालाही माहिती आहे, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.

जयंत पाटील आज सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, ''त्यांच्या मी पुन्हा येईनची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) असली पाहिजे आम्हाला नाही. ते पुन्हा येईन म्हणत आहेत पण ते आलेलेच आहेत फक्त दोन नंबरला बसलेले आहेत. आता मी पुन्हा येईन म्हणत आहेत म्हटल्यावर शिंदेंना बाजूला ढकलून ते जर आता मुख्यमंत्री पदावर बसत असतील तर त्याची चिंता शिंदेंनी करायला पाहिजे''

Eknath Shinde, Devendra Fadnavis News
Uddhav Thackeray in Barsu : महाराष्ट्राला 'राख' अन् गुजरातला 'रांगोळी'; ठाकरेंचा भाजपवर निशाणा

''मुख्यमंत्री शिंदेंबरोबर जे चाळीस वीर गेलेले आहेत त्या सगळ्यांनी आता चिंता केली पाहिजे, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला. राज्यात होणाऱ्या कोणत्याही चांगल्या कामाला राष्ट्रवादीचा (NCP) विरोध नाही. केंद्र सरकारने कामगार कायदे बदलले आहेत. त्यामुळे तीनशेहून कमी कामगार असलेल्या ठिकाणी कामगारांना कोणतेही संरक्षण मिळणार नाही, यातून कामगारांचे शोषण होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

बारसू येथील कामगारांचे, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये, तिथल्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचा विश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण करावा, अशी आघाडीची भूमिका आहे. यासाठीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू येथे भेट दिली, असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Eknath Shinde, Devendra Fadnavis News
Sanjay Shirsat On Ajit Pawar : मी त्यांच्या पक्षाचा नाही म्हणून निधी नाकारला होता, तरी अजित पवार चांगला माणूस..

तसेच या प्रकल्पातून पर्यावरणाची हानी होणार नाही, असा विश्वास स्थानिकांना झाला तर ते लगेच प्रकल्पाला मान्यता देतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. स्थानिक लोकांचे समाधान सरकारने केले पाहिजे. नाणार येथेही लोकांना विश्वासात घेऊन काम करणे आवश्यक होते, ते कदाचित झाले नसेल, असेही पाटील म्हणाले.

लोकांची समजूत घालणे, त्यांना विश्वासात घेणे हे कोणत्याही विकास कामाचे पाऊल आहे. ते जर सरकार असेल तर अनेक प्रश्न तयार होतात. यातून स्थानिकांना हा प्रकल्प आपल्या विरोधी असल्याचे वाटते, असे जयंत पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com