जयंत पाटील कडाडले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांना स्वत:ला निर्णय घेता येत नाहीत...

Jayant Patil : शिंदे-फडणवीस एकत्रित दौरा का करत आहेत. याबाबत काही कळत नाही...
Devendra Fadanvis, Jayant Patil & Cm Eknath Shinde
Devendra Fadanvis, Jayant Patil & Cm Eknath ShindeSarkarnama

अहमदनगर : महाराष्ट्रातील शेतकरी आज दिवाळी साजरी करू शकत नाही. राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी तसे केले नाही. यामुळे सर्वांच्याच उत्सवावर विरजण पडलं आहे.

राज्यातील 'वेदांता फॉक्सकॅान' हा प्रकल्प या सरकारमुळे गेल्याने राज्यातील बेरोजगार तरूणांचं प्रचंड मोठं नुकसान या सरकारने केलं आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केला आहे. (Devendra Fadanvis, Jayant Patil & Cm Eknath Shinde Latest news)

पाटील म्हणाले, दिवाळी सुरू आहे मात्र आनंदाचा शिधा अनेक ठिकाणी पोहोचलाचं नाही. यामुळे अनेकांची दिवाळी झाली नाही. दुसरीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळे सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल असं वाटलं होतं. मात्र सरकारने असं काहीही केलं नाही. त्यामुळे सर्वांच्या उत्सवावर विरजण पडल आहे.

राज्यातील सरकारी नोकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारनेच मान्यता दिली होती. या सरकारने त्यापलीकडे जाऊन खाजगी गुंतवणूक आणून राज्यातील युवकांना रोजगार द्यायला हवा होता. मात्र त्यांनी राज्यातील वेदांत फॉक्सकॅान प्रकल्प गुजरातला देऊन राज्यातील बेरोजगार तरुणांचं शिंदे-फडणवीस सरकारने प्रचंड मोठ नुकसान केल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, सध्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारही इतरांना विचारल्याशिवाय तो निर्णय घेता येत नाही. ही नवीनच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे, असा खोचक टोलाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळणार नाही. यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचीही चर्चा ऐकायला मिळते, असाही चिमटाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.

दरम्यान, पाटलांनी पुढे बोलताना मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांवरही टीका केली. ते म्हणाले की, भू-विकास बँकेचे अस्तित्व सध्या राहिले नाही. आमच्या सरकारच्या काळातच तो निर्णय झाला होता. शरद पवारांच्या प्रयत्नामुळेच भारतातील स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कर्जमाफी झाली होती. याबाबत राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसमध्ये असताना या गोष्टीचे कौतुकही केलं होतं. मात्र ते आता भाजपमध्ये गेल्याने पवारांवर टीका करत असतील, असा टोलाही त्यांनी लगावलायं.

तसेच, राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री लवकरच एकत्र राज्याचा दौरा करत असल्याची चर्चा आहे. मात्र ते हा एकत्रित दौरा का करत आहेत. याबाबत काही कळत नाही. यामुळे राज्याचे व्यवस्थापन आणि प्रशासनावर परिणाम होऊ शकतो. असेही मत पाटलांनी व्यक्त केलं. आता जयंत पाटलांच्या या टीकेला भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर येत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com