
कऱ्हाड : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर नगरसेवक, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील गांधीची यात्रा कॉंग्रेसच्या नेत्यांनी हायजॅक केली. त्या नेत्यांनी आपली मुले राजकारणात आणण्यासाठी यात्रेचा वापर केला. सर्वसामान्य लोक मात्र कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेपासुन लांबच आहेत, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे भारत जोडो यात्रेवर केली.
बावनकुळे हे कऱ्हाडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधीस्थळी अभिवादन करुन पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, सरचिटणीस अतुल भोसले, प्रदेश सरचिटणीस विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. बावनकुळे म्हणाले, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावुन आम्ही उर्जा घेवुन महाराष्ट्रभर आम्ही सर्व कार्यकर्ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचे कल्याण होण्यासाठी आम्ही जो वसा घेतला आहे, तो कायम पुढे सुरु ठेवु.भारत जोडो यात्रेसंदर्भात ते म्हणाले, राहुल गांधीची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये सुरु असताना सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या दीड हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
नंदुरबारच्या कॉंग्रेसच्या चार नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रात ती यात्रा आल्यावर ती कॉंग्रेसच्या नेत्यांनी हायजॅक केली. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपली मुले राजकारणात आणण्यासाठी यात्रेच वापर केला. सर्वसामान्य कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र कोणतीही दखल घेतली नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.