खानापूरचा पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल

राष्ट्रवादीकडून सर्वातोपरी तयारी सुरू करण्यात आली आहे
Vaibhav Patil
Vaibhav PatilSarkarnama

आळसंद (जि. सांगली) : खानापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड झाली, त्या काळात बाबासाहेब मुळीक यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळली. आम्ही अलिकडेच राष्ट्रवादीत आलो आहोत. आम्हाला संभाळून घ्या. यापुढचा खानापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा विश्वास माजी नगराध्यक्ष अॅड वैभव पाटील यांनी व्यक्त केला. आगामी काळात राष्ट्रवादीचा आमदार करण्यासाठी सर्वातोपरी तयारी सुरू असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. (Khanapur's next MLA will be from NCP : Vaibhav Patil)

आळसंद येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर‌ आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक‌, सुशांत देवकर प्रमुख उपस्थित होते. अॅड. पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ‌खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जुन्या, नव्यांची सांगड घालत राष्ट्रवादी भक्कम केली जाईल. कोणताही परिस्थिती २०२४ चा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. यासाठी प्रामाणिक प्रयत्न करूया.

Vaibhav Patil
राष्ट्रीय समाज पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अॅड. मुळीक म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम होत आहे. तरूणांना वाव देण्याचे सर्वांनुमते ठरले आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पद्धाधिकारी संवाद‌ अभियान सुरू आहे.

या वेळी सुशांत देवकर, नितिन जाधव, प्रवीण डबाणे, अजित जाधव, प्रा. संतोष जाधव यांची भाषणे झाले. या वेळी ‌कोरोना कालावधीत वैद्यकीय ‌अधिकारी, आरोग्य सेविका, आशासेविका यांना कोरोना योद्धा म्हणून ‌सन्मानित केले. यावेळी राष्ट्रवादीचे विटा शहराध्यक्ष अविनाश चोथे, मनोहर चव्हाण, प्रा. प्रशांत पवार, बंटू मोरे, रोहित जंगम, तानाजी जाधव, बापूसाहेब हारुगडे, आण्णासाहेब जाधव यांच्यासह ‌युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Vaibhav Patil
बहिणीच्या प्रचारात खासदार हिना गावित यांची प्रतिष्ठा पणाला?

तुम्हाला झालेला त्रास आम्हाला माहीत आहे

आळसंद माळावर तीन‌ वर्षांपूर्वी विराज शुगर कारखाना उभा राहिला आहे. ‌तो उभा राहत असताना ग्रामपंचायतीने ना हरकत पत्र दिले. ते कायम स्मरणात राहील. नितिन जाधव यांच्याकडे माजी नगराध्यक्ष अॅड. पाटील कटाक्ष टाकत म्हणाले, पत्र दिल्यामुळे तुम्हाला झालेला त्रास आम्हाला माहिती आहे. या वाक्यावर एकाच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com