
Uttamrao Jankar on Vijaysinh Mohite-Patil: ''जेव्हा शेवटचा माणूस मैदानात असतो, तेव्हा त्याच्यावर नियंत्रण ठेवणं प्रस्थापितांना शक्य नसतं. त्यामुळे मला पुर्णपणे खात्री आहे हा विजय येणाऱ्या निवडणुकांसाठी लोकांचा उत्साह वाढवणारा आहे. माझा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा करणारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कालचा निकाल आहे.'' या शब्दात अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केला. (Jankar, who destroyed the fortress of Mohite-Patil, says, I will become an MLA)
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील अकलूज (Akluj) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) पंचवार्षिक निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील पॅनेलने (Mohite Patil) अपेक्षप्रमाणे बाजी मारली आहे. मात्र, तालुक्याच्या इतिहासात बाजार समितीत प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उत्तमराव जानकर (Uttam Jankar) यांच्या रुपाने विरोधकाचा प्रवेश झाला आहे. त्यांच्या या विजयानंतर ‘सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत जानकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गेल्या तीस वर्षात चाळीस वेळा पराभूत झालेला मी कार्यकर्ता आहे. निवडणूक ही परिवर्तनासाठी त्यासाठी लढाई व्हावी, लोकांना स्वातंत्र मिळावं त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांचे अधिकार मिळावेत, यासाठी मी या निवडणुका लढवत आहे. ग्रामपंचायत असो वा सेवा सोसायटी मतदारसंघ असोत, हे सत्तेच्या आणि प्रस्थापितांच्या बाजूला राहणारे लोक असतात. ज्यांनी संस्था स्थापन केल्या. पण यात ही मोहिते पाटील यांचा अंदाधुंद आणि बेधुंद काळा कारभार गेल्या काही वर्षापासून सुरु होता. अशा पद्धतीने या संस्थेचं रुपातंर झाल्यानंतर यातून काही चांगले लोक बाहेर पडू लागले. त्याचाच परिणाम म्हणजे माझा हा दैदिप्यमान विजय झाला. (Solapur Politics)
तुमच्या पॅनलने मोठी झुंज दिली.मोहिते पाटील यांचे १७ सदस्य निवडून आले, तुमच्या पॅनलमध्ये तुम्ही एकटे निवडून आले असला तरी पद्मजादेवी मोहिते पाटील आणि के.के. पाटील यांच्या पराभवाचं कारण काय? या प्रश्नावर जानकर म्हणाले, ‘‘ या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. जवळपास चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल मोहिते-पाटील यांनी या निवडणुकीत केली.अतिशय घाणेरड्या पद्धतीने वापर केला गेला.’’
सत्तेच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी खूप प्रयत्न केले, पण कुणीतरी वेगळा व्यक्ती संस्थेत असावा, अशी लोकांची इच्छा होती. त्यामुळेच माझी निवड लोकांनी केली. आमचे सहकारी थोडे कमी पडले, पाच पन्नास मते थोडी कमी पडली, ती मते मिळाली असती तर तेही विजयी झाले असते, असेही जानकर यांनी यावेळी सांगितले.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.