Ashutosh Kale : कोपरगाव ( जि. अहमदनगर ) - कोरपगाव शहरातील चौकात दोन दिवसांपूर्वी दहिहंडी स्वागत कमान उभारणीवरून वाद झाला होता. यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत राडा झाला होता. या पार्श्वभूमीवर काल ( शुक्रवारी ) रात्री दहिहंडी कार्यक्रमात शिर्डीतील साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा कोपरगावचे आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale ) यांनी भाजपचे नेते व कार्यकर्त्यांना इशारा दिला.
दहीहंडी उत्सव स्वागत कमान उभारण्यावरून 2 दिवसांपूर्वी कोपरगाव शहरात मध्यरात्री भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यां मध्ये राडा झाला होता. त्यानंतर काल दोन्ही पक्षाचे दहीहंडी कार्यक्रम देखील त्याच जागेवर शेजारी शेजारी झाले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादीचे आमदार तथा साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी विरोधकांना टोला लगावला.
आमदार आशुतोष काळे म्हणाले की, आमच्या नादाला लागलं तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. काही लोकांना वाटतंय सरकार बदललय. त्यामुळे उत्साह वाढलाय त्यांचा मात्र आमदार बदललेला नाही आमदार मीच आहे, असा टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.