ठरलेलं लग्न मोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर पळून गेली

राज्यातील जनतेने त्या निवडणुकीत आम्हाला आशीर्वाद दिला होता.
Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama

सोलापूर : लोकसभेला आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवली. राज्यातील जनतेने त्या निवडणुकीत आम्हाला आशीर्वाद दिला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांत सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेच्या २८८ जागा लढवल्या आणि त्याही निवडणुकीत आम्हाला अपक्षांसह १८० जागा दिल्या होत्या. पण, हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेने निवडणुकीनंतर घेतली. ठरलेले लग्न मोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर पळून गेली, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात केली. (Former Minister of State Sadabhau Khot criticizes Shiv Sena)

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. आम्ही जर गनिमा कावा केला असता, तर शिवसेनेच्या पाचसुद्धा जागा निवडून आल्या नसत्या, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. त्याबाबत विचारले असता सदाभाऊ खोत यांनी वरील शब्दांत उत्तर दिले होते.

Sadabhau Khot
जितेंद्र आव्हाडांकडून महाविकास आघाडीला घरचा आहेर..

खोत म्हणाले की, शिवसेना-भाजप महायुतीने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढवली होती. त्या निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला आशीर्वादही दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर, अशी भूमिका घेतली. भाजपबरोबर ठरलेले लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने नवरी पळून जावी, तशी शिवसेना ही दुसऱ्याबरोबर पळू गेली, त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार शिवसेना जर स्वतंत्रपणे निवडणूक लढली असती, तर त्यांना कळलं असतं. दरम्यान, विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून चांगल्या जागा मिळवल्या आहेत, असा दावाही सदाभाऊ खोत यांनी या वेळी बोलताना केला.

Sadabhau Khot
मुख्यमंत्री संतापले अन् बसले थेट खाली फरशीवरच!

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे एक विदूषक आहे. महाराष्ट्रातील जनतेची करमणूक करण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे जे संकट उभं ठाकलं आहे, त्यासाठी पंचनामे न करता सरसकट तातडीने खरीप पिकाला 60 हजार आणि बागायती पिकाला एक लाख रुपये प्रतिएकर अनुदान द्यावे, अशी मागणी खोत यांनी केली आहे. तसेच, रयत क्रांती संघटनेकडून उसाला एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशामधील लखमीपूर खिरी येथील शेतकरी आंदोलनादरम्यान ८ जणांना जीव गमवावा लागला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांना चिरडले होते. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावावा आणि शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडणाऱ्या क्रूरकर्म्याला फासावर लटकावावे, अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com