Maan : शिंदे, फडणवीस सरकारमुळे खटाव- माणला टेंभूचे पाणी... डॉ. दिलीप येळगांवकर

सध्‍याच्या शासनाने Shinde Shivsena दोन्ही तालुक्यांना पाच टीएमसी पाणी मंजूर केले आहे. हे पाणी खटाव Khatav तालुक्यातील कलेढोण, गारळेवाडीसह चौदा गावांना 14 villeges मिळणार आहे.
Eknath Shinde, Dilip Yelgavkar, Devendra Fadanvis
Eknath Shinde, Dilip Yelgavkar, Devendra Fadanvissarkarnama

वडूज : खटाव- माण तालुक्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेतील जे पाणी मिळणार आहे. त्या कामाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आले आहेत. सध्‍याच्या भाजप व शिंदे गट शिवसेना सरकारमुळेच हे काम मार्गी लागल्याचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर यांनी नमूद केले आहे.

डॉ. दिलीप येळगांवकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, टेंभू उपसा सिंचन योजनेस एक जानेवारी १९९७ मध्ये मंजूरी मिळाली आहे. या योजनेत एकूण २२.१३ टीएमसी पाणीसाठा मंजूर झालेला आहे. सातारा, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील केवळ दुष्काळी तालुक्यांना पाणी देणे हा योजनेचा मुख्य उद्देश होता.

Eknath Shinde, Dilip Yelgavkar, Devendra Fadanvis
Maan : माण, खटाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझं मंत्रिपद...

शासनाच्या धोरणानुसार समन्यायी पाणी वाटप व अतितुटीच्या खोऱ्यांना प्राधान्य देणे गरजेचे होते. या योजनेतून एकूण ७९ हजार ६०० हेक्टर एवढी जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यापैकी फक्त ०.१ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्याला देण्याचा निर्णय झाला होता. टेंभूच्या मूळ पाणी वाटपाच्या धोरणात खटाव- माण तालुक्यांना सात टीएमसी पाणी मिळणे गरजेचे होते.

Eknath Shinde, Dilip Yelgavkar, Devendra Fadanvis
गोरेंसारख्या आमदाराची भाजपला गरज नाही: येळगावकर 

मात्र, ते ०.०१ टीएमसी तेही कऱ्हाड तालुक्यातील सहा गावांना मंजूर करण्यात आले होते. या विरुद्ध आपण स्वत:, तसेच माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी उच्‍च न्यायालयात मुंबई येथे पीओएल २१०/२००९ या क्रमांकाने रिट पिटिशन याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर राज्य शासनाच्या विनंती अर्ज समितीकडे २३ मे २००० रोजी अर्ज दाखल केला होता.

Eknath Shinde, Dilip Yelgavkar, Devendra Fadanvis
सातारा राष्ट्रवादीतील अनेक नेते आमच्या संपर्कात : शिंदे सरकारमधील मंत्र्याचा गौप्यस्फोट

या सर्वांची दखल घेऊन सध्‍याच्या शासनाने दोन्ही तालुक्यांना पाच टीएमसी पाणी मंजूर केले आहे. हे पाणी खटाव तालुक्यातील कलेढोण, गारळेवाडीसह चौदा गावांना मिळणार आहे. त्याचबरोबर चितळी येथील उड्डाण पुलाजवळ नवीन गेट मंजूर करून परिसरातील ५४१ हेक्टर क्षेत्रास सिंचन लाभ मिळवून देण्यास आपणास यश मिळाल्याचे डॉ. येळगांवकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com