
सातारा : कोणासोबत आघाडी होणार हे आम्हाला विचारत बसू नका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व मनपा निवडणुकीत सातारा, पुणे जिल्ह्यात आपल्याला स्वतंत्र लढायचे आहे, हे ध्यानात घेऊन तयारी करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना दिला आहे.
उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे बाळासाहेब सोळसकर यांच्या ६१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात श्री. पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, नारायण महाराज, खासदार श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना कानपिचक्याही दिल्या. आगामी निवडणुकांबाबत भाष्य करताना अजित पवार म्हणाले, १९९९ पासून पुणे, सातारा जिल्ह्यातील निवडणुका आपण स्वतंत्रपणे लढल्या आहेत. त्यामुळे कोणाशी आघाडी होणार याबाबत आम्हाला विचारत बसू नका.
तुम्हाला स्वतंत्र लढायचे आहे हे लक्षात घेऊन तयारी करा. जिथे आपली ताकद मोठी तिथे स्वतंत्र लढलो होतो, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे. आघाडीबाबत राज्यस्तरावर निर्णय होणार आहे. उद्धव ठाकरेंसोबत आघाडी करायची का नाही ते वरिष्ठ नेते ठरवतील. तोपर्यंत आपण कामाला लागावे, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच मनपा निवडणुकाही स्वबळावर लढण्याची तयारी करा, असेही त्यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.