सातारा : साखर कारखान्यांनी मागील हंगात योग्यदर दिलेला नाही. यंदाच्या हंगामात ऊसाचा दर जाहीर न करताच कारखाने सुरू केल्याने संतप्त झालेल्या बळीराजा शेतकरी संघटनेने कराड तहसिल कार्यालयासमोर ऐन दिवाळीत खर्डा भाकरी खात आंदोलन केले. सरकार व कारखानदारांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मोळी टाकून यावर्षीचा गळीत हंगाम सुरू केला आहे. प्रत्येक वर्षी ऊस गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी साखर कारखान्यांकडून ऊस दर जाहीर केला जातो. पण, यावर्षी साखर आयुक्तांच्या सुचनेनुसार ऑक्टोंबरपासून कारखान्यांनी गाळपास सुरवात केली आहे. त्यामुळे ऊस दराबाबत शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे.
ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने आज साखर कारखानदार व सरकारच्या निषेधार्थ आज कराडमध्ये तहसिल कार्यालयासमोर खर्डा भाकरी आंदोलन केले. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार व कारखानदार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना पंजाबराव पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील हंगामात योग्य ऊसदर दिलेला नाही. तसेच यंदाचा ऊसाचा दर जाहीर न करताचकारखाने सुरू केले आहेत. त्यामुळे कारखान्यांनी तातडीने ऊस दर जाहीर करावा. तसेच मागील बाकी ही द्यावी.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.