Satara : बाळासाहेब पाटलांचा देसाईंना सल्ला... सत्ता येईल हे गृहित धरू नये...

शिवसेनेचे Shivsena आमदार MLA सोडून गेले, हा भाजपचाच अजेंडा BJPs Agenda होता. राज्यात कोणाची सत्ता येईल हे कोणीही सांगू शकत नाही.
Balasaheb Patil, Shambhuraj Desai
Balasaheb Patil, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : सत्ता आज आहे आणि उदया नाही, त्यामुळे सत्ता येईल किंवा नाही, हे कोणी गृहित धरू नये. शिवसेनेचे आमदार सोडून गेले, हा भाजपचा अजेंडा होता. त्यामुळे कोण किती वेळ सत्तेत राहिल हे ही सांगता येणार नाही, असा चिमटा राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना काढला.

साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्ता नसल्याने ते तळमळत आहेत. पण, पुढील दहा, १५ वर्षे तरी राष्ट्रवादीला सत्तेसाठी तळमळावे लागणार आहे, अशी टीका केली होती. त्या टीकेवर आज राष्ट्रवादी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना विचारले असता त्यांनी शंभूराज देसाईंना चिमटा काढला.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, सत्ता आज आहे आणि उदया नाही, त्यामुळे सत्ता येईल किंवा नाही, हे कोणी गृहित धरू नये. शिवसेनेचे आमदार सोडून गेले, हा भाजपचाच अजेंडा होता. राज्यात कोणाची सत्ता येईल हे कोणीही सांगू शकत नाही. कोण किती वेळ सत्तेत राहिल हे ही सांगता येत नाही. पण, सध्याच्या परिस्थितीत राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Balasaheb Patil, Shambhuraj Desai
Satara : सत्ताधाऱ्यांकडून लोकांना संभ्रमित करण्याचा डाव... बाळासाहेब पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com