
Mumbai News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात उपोषण अस्त्र उपासले आहे. यामुळे राज्यभरात आता मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. याच दरम्यान मराठा आरक्षणासाठी काही तरूणांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. यावर आता माजी खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन, तरुणांच्या आत्महत्यांमुळे मन व्यथित झाल्याची भावना व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)
संभाजीराजे म्हणाले, 'माझं मन व्यथित झाल्याने पत्रकार परिषद घेत आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण आंदोलने सुरू आहेत. मराठा समाजातील २ तरुणांच्या आत्महत्येमुळे मी व्यथित झालो आहे."
"जरांगे पाटील हे सामान्य कुटुंबातील असून स्पष्टपणे भूमिका व्यक्त करणारी व्यक्ती आहे. त्यांची मागणी आहे की, मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळावं. हे कुणबी आरक्षण टिकणार असेल तरच कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवे, नाहीतर सरकारने मराठा समाजाची फसवणूक करू नये. जरांगे यांच्यासोबत आम्ही उभे राहणार आहोत," असेही संभाजीराजे म्हणाले.
"तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं, पण ते सुप्रीम कोर्टात टिकले नाही. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते. यानंतर मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात पत्र पाठवले होते, पण त्यांच्याकडून सांगण्यात आले की, वकील खूप महागडे आहेत," असे संभाजीराजे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.