
महाराष्ट्रात आज कोरोना रुग्ण संख्या कमी असून महाराष्ट्र सध्याच्या कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतीत 8 व्या नंबरला आहे. राज्यात चांगल्या पद्धतीने झालेल्या लसीकरणाचा हा परीणाम आहे. सर्व वयोगटातील नागरीकांना लसीकरण करण्यात येणार असून केंद्राकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन केलं जाईल, आरोग्य विभागाला तशा सूचना केल्या जातील. तोपर्यंत नागरीकांनी मास्क वापरावा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त जालन्यात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर माध्यमांशी बोलत होते. भविष्यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्यास मास्क सक्ती करावी लागेल, असा इशाराही टोपे यांनी दिला आहे.
शनिवारी (30 एप्रिल) महाराष्ट्रात कोरोनाचे 155 नवीन रुग्ण आढळले. 135 लोक कोरोनामधून बरे झाले. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सुमारे एक हजारावर पोहोचली आहे. सध्या राज्यात 998 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यात शनिवारी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 77 हजार 28 हजार 891 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. सध्या राज्यात कोरोना बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे.
तर दूसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील राज्यातील मास्क सक्तीबाबत भाष्य केलं आहे. राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढली तर निर्बंध लावावे लागू शकतात, तशी वेळ आली तर टास्क फोर्सशी बोलून निर्णय घेतला जाईल. राज्यातही रुग्णांचे प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केली तर पुन्हा काही निर्बंध लागू शकतात. असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाचे संकट कमी झालं असलं तरी अजून ते संपलेल नाही, अशी आठवणही अजित पवार यांनी करुन दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.