
Aurangabad Political News : मोदी सरकारने येत्या १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष पाचदिवसीय अधिवेशन बोलावले आहे. (Loksabha Session News) हे अधिवेशन अचानक कशासाठी ? त्याचा अजेंडा काय? याबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. यावरून विरोधक सरकारवर तुटून पडले आहेत. काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष अधिवेशनाचा अंजेडा स्पष्ट करा, असे पत्र पाठवले आहे.
विशेष अधिवेशनातून सरकार कुठला धक्का देणार याची उत्सूकता लागलेली असतांना खासदारांमध्ये मात्र बेचैनी वाढली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी याच मुद्यावरून मोदी सरकारला टोला लगवाला आहे. (Aimim) इम्तियाज जलील यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून एक खासदार म्हणून मला विशेष अधिवेशनाचा अजेंडा कळेला का? अशी विचारणा केली आहे.
मला अपेक्षा आहे की निवडणुकीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकार सर्व खासदारांसाठी ५ दिवसांचा संगीत महोत्सव आयोजित करण्याचा विचार करत आहे. (Aurangabad) जेणेकरून ते १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात शांत बसतील ! तसे नसेल तर एक खासदार म्हणून मला सरकारला विचारण्याचा अधिकार आहे की, अधिवेशनात तुम्ही कोणते काम करणार आहात?
अजेंड्याबाबत गुप्तता का ? अशा शब्दात इम्तियाज यांनी सरकारला चिमटे काढले आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर करण्याची मागणी केली आहे. कोणतीही चर्चा न करता विशेष अधिवेशन का जाहीर करण्यात आले, असा सवाल सोनिया गांधी यांनी केला आहे.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.