Aurangabad News : पाणी योजनेचे ग्रहण सुटेना, प्रशासकीय मान्यता नसल्याने निविदा रखडली..

Municipal Corporation : प्रशासकीय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत जीवन प्राधिकरणाला कामाला हिरवा कंदील दाखवता येणार नाही.
Aurangabad Water Issue News
Aurangabad Water Issue NewsSarkarnama

Water Issue : शहराच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १९३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा (Water Supply)योजना तातडीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण सुरवातीला निविदा प्रक्रियेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद व आता प्रशासकीय मान्यता नसल्याने काम थंडबस्त्यात पडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सध्या प्रशासकीय मान्यतेची वाट पाहत आहेत.

Aurangabad Water Issue News
Imtiaz Jalil News : देसाईसाहेब माझ्याविरोधात मानहानीचा खटला कधी दाखल करणार ? तो कराच..

शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. शासनाने १,६८० कोटी रुपयांच्या योजनेला सुरवातीला मान्यता दिली होती. (Aurangabad) आता ही योजना केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये टाकण्यात आली. (Municipal Corporation) त्यानंतर योजनेची किंमत २,७४० कोटींवर गेली. या योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी २०२४ उजाडणार असल्याने त्यापूर्वी शहराला तात्पुरता दिलासा देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १९३ कोटी रुपये खर्च करून जुन्या ७०० मिलिमिटर योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्याने ही योजना काही काळ रखडली. नव्या शिवसेना-भाजप सरकारने पाणी पुरवठा योजना अमृत-२ मध्ये टाकताना त्यातच १९३ कोटीच्या योजनेचा समावेश केला. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. कामाचे चार टप्पे करण्यात आले आहेत. तीनवेळा निविदा काढल्यानंतर प्रतिसादही मिळाला पण निविदा प्रक्रिया अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही.

कारण या योजनेला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. जोपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत निविदा प्रक्रिया अंतिम करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई येथे दोन दिवसांपूर्वी उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

ही बैठकही ऐनवेळी आचारसंहितेचे कारण देत रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जोपर्यंत योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत जीवन प्राधिकरणाला निविदा अंतिम करून कामाला हिरवा कंदील दाखवता येणार नाही, त्यामुळे औरंगाबादकरांना पाण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com