Subhash Desai : उद्धव ठाकरेंची औरंगाबादेत `मास्टर सभा`, मैदान अपुरं पडेल..

औरंगाबादचे नामकरण कधी करणार? यावर काम सुरू आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर यापुर्वीच केले आहे. आम्ही संभाजीनगरच म्हणतो. अधिकृतपणे शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. (Subhash Desai)
Guardian Minister Subhash Desai-Cm Uddhav Thackeray
Guardian Minister Subhash Desai-Cm Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : बीकेसीतील रेकाॅर्डब्रेक सभेनंतर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औंरगाबादच्या (Aurangabad) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या (Shivsena) पहिल्या शाखा स्थापनेचा वर्धापनदिन असल्यामुळे ही सभा होत आहे. ही सभा देखील मास्टर सभा असेल, गर्दीमुळे मैदान अपुरं पडले, असा विश्वास शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योग मंत्री अनिल देसाई यांनी व्यक्त केला.

या सभेची लोकांमध्ये प्रचंड उत्सूकता आहे, केवळ औंरगाबादच नाही, तर मराठवाड्यातून सभेसाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत, असेही देसाई (Subhash Desai) यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. (Uddhav Thackeray) औरंगाबादेत होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी मुंबईत शिवसेनेचे नेते सुभाष देसाई,सचिव अनिल देसाई यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील नेते व पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली.

बैठकीनंतर माहिती देतांना देसाई म्हणाले, उद्धव ठाकरे यांची गेल्या कित्येक वर्षात मराठवाड्यात जाहीर सभा झालेली नाही. त्यामुळे ८ जून रोजीच्या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः मराठवाड्यात प्रचंड उत्सूकता आहे, त्यामुळे ही सभा निश्चितच यशस्वी होणार. ही साधी सभा नसून विशेष सभा आहे, ही मास्टर सभा आहे. सभेला होणारी गर्दी पाहता मुंबई प्रमाणेच औरंगाबादेत देखील मैदान अपुरं पडेल अशी परिस्थिती आहे.

अशावेळी येणाऱ्या कार्यकर्त्यांची, सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य नियोजन कसे करता येईल याची चर्चा आजच्या बैठकीत झाली. शिवसेनेच्या प्रत्येक सभेमध्ये शिस्त असते तीच शिस्त ८ जून रोजीच्या मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर देखील पहायला मिळेल. राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भात विचारले असता ते देसाई म्हणाले, या संदर्भात पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल,अजून चित्र स्पष्ट होणार आहे.

संभाजीराजे यांच्या संदर्भातला निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर नाही, तर प्रमुख नेते घेतील. केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. या भेटीत विमानतळाच नामांतर करणे , धावपट्टीची लांबी वाढवणे, मुंबईतून सकाळच्या वेळी उड्डाण सुरू करावे आदी मागण्या केला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

Guardian Minister Subhash Desai-Cm Uddhav Thackeray
Obc Reservation : मध्यप्रदेश करु शकते, महाराष्ट्र सरकार का नाही ?

औरंगाबादचे नामकरण कधी करणार? यावर काम सुरू आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर यापुर्वीच केले आहे. आम्ही संभाजीनगरच म्हणतो. अधिकृतपणे शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. भाजपचे लोक फक्त इथेच मागणी करतात, केंद्रात जाऊन पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडे करत नाहीत, असा टोला देखील देसाई यांनी यावेळी लगावला.

केवळ राज्य सरकारवर आरोप ,टीका करण्याचे काम भाजप करतंय. आम्ही आमच काम आणि पाठपुरावा करतोय, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री अर्जून खोतकर आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com