सत्तेत असलेल्या पक्षाने पीक विमा कंपन्यांची कार्यालये फोडली, म्हणून शेतकऱ्यांचे नुकसान

(Bjp State President Chandrakant Patil) महाविकास आघाडी सरकारकडून तिसऱ्यांदा पंचनामे केले जात आहेत. सगळे पीक, शेत जमीनी गेल्याचे स्पष्ट दिसत असतांना पंचनामे कसले करता?
Bjp Leader Chandrakant Patil
Bjp Leader Chandrakant PatilSarkarnama

हिंगोली ः राज्यात अतिवृष्टी आणि पूराने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भात हे नुकसान अधिक आहे. राज्याने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असले तरी अजून शेतकऱ्यांच्या हातात एक रुपया देखील आलेला नाही. दिवाळी तोंडावर आली आहे, अशाने शेतकऱ्यांची दिवाळी काळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पीक विमा कंपन्यांनी हात वर केले आहे, आज सत्तेत असणाऱ्या पक्षाने या कंपन्यांची कार्यालये फोडली, त्यामुळे या कंपन्या पीक विमा द्यायला तयारच नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. पाटील हिंगोली येथे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अतिवृष्टी, पूरग्रस्तांना दिलेली मदत आणि महाविकास आघाडी सरकारचा सुरू असलेला घोळ यावर टीका केली. पाटील म्हणाले, फडणवीस सरकारच्या काळात आतापर्यंतच्या एकाही मुख्यमंत्र्यांने काढला नाही असा जीआर काढण्यात आला होता. ज्यामध्ये शेतातील पीक नष्ट झालेल्या शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ, तिप्पट नुकसानभरपाई केंद्राच्या निकषापेक्षा अधिकची मदत अशी ९ हजार चारशे कोटींची मदत २०१९ मध्ये फडणवीस सरकारने केली होती.

पंचनामे हा विषयच तेव्हा बाद केला होता. याउलट महाविकास आघाडी सरकारकडून तिसऱ्यांदा पंचनामे केले जात आहेत. सगळे पीक, शेत जमीनी गेल्याचे स्पष्ट दिसत असतांना पंचनामे कसले करता? आम्ही जशी सरसकट मदत केली होती, तशीच या सरकारने केली पाहिजे होती. आमच्या काळात सरकारी मदत आणि पीक विम्याचे पैसे देखील मिळाले होते. पण आता पीक विमा कंपन्या विमाच काढायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे.

Bjp Leader Chandrakant Patil
सत्तर टक्के मतदान मिळवून द्या,फडणवीसांसोबत जेवणाची संधी मिळवा; प्रदेशाध्यक्षांचा फंडा

राज्यातील सहा पैकी चार विभागात पीक विमा कंपन्या आलेल्याच नाहीत. त्यामुळे उरलेल्या दोन कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. सत्तेत असलेल्या पक्षाने तेव्हा पीक विमा कंपन्यांची कार्यालये फोडली होती, ते आता मात्र गप्प आहेत, असा टोला देखील पाटील यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com