मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले, ईडी कारवाईच्या भितीपोटी कोणी येत असेल तर येऊ नका..

जे आमदार,खासदार आमच्यासोबत आले, त्यापैकी एकाने तरी असे सांगितले का, की ईडीचा दबाव होता म्हणून आम्ही शिवसेनेत किंवा भाजपमध्ये आलोय. मग हे आरोप कशासाठी ? (CM Eknath Shinde)
Cm Eknath Shinde Press News In Aurangabad
Cm Eknath Shinde Press News In AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांच्या मुंबईतील तीन्ही घरांवर छापे टाकले आहेत. मरेन पण भाजपमध्ये जाणार नाही, असे ट्विट करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकार व भाजपला आव्हान दिले. ईडी कारवाईच्या भिती पोटीच शिवसेनेचे खासदार, आमदार भाजपमध्ये जात असल्याचा आरोप देखील केला जातोय.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी औरंगाबादेत महत्वाचे आवाहन केले आहे. आमच्या सोबत आलेल्या कोणीही आम्ही ईडीपासून सुटका व्हावी म्हणून शिंदे किंवा भाजपसोबत गेलो असे सांगितलेले नाही. (Ed) माझे या निमित्ताने सगळ्या राजकीय पक्षाच्या आमदार, खासदार आणि नेत्यांना आवाहन आहे की, ईडीच्या भितीपोटी कोणीही शिवसेना, भाजपमध्ये येऊ नका, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांकडून होत असलेले आरोप फेटाळून लावले.

राज्यमंत्री मंडळाचा विस्तार देखील लवकरच होईल, तुम्ही काळजी करू नका, असे आवाहन देखील त्यांनी पत्रकारांना केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री वैजापूरहून तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर पुन्हा सकाळीच ते औरंगाबादेत आले आणि नियोजित दौरा पुढे सुरू केला. शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिरात आरती केल्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकारांना संबोधित केले.

दौरा अर्धवट सोडून तातडीने दिल्लीला गेला होतात, नेमंक काय कारण? असा प्रश्न विचारला तेव्हा, शिंदे म्हणाले, मी संभाजीनगरात आहे, तेव्हा दिल्लीचं कशाला विचारता, इथंल, मराठवाड्यातलं विचारा. मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल, त्याची काळजी करू नका. आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

यामध्ये पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान, उपसासिंचन योजनांना मंजुरी व निधी, समुद्रात वाहून जाणारे पाणी अशा महत्वाच्या विषयावर काम सुरू झाले आहे. त्यामुळे राज्याचा विकास मंत्रीमंडळा आभावी रखडलेला नाही, पण मंत्रीमंडळ विस्तारही लवकरच होईल.

Cm Eknath Shinde Press News In Aurangabad
संजय राऊतांवरील कारवाईही ब्लॅकमेल करण्यासाठी...

संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली, यावर कर नाही तर डर कशाला, असे म्हणत शिंदेंनी या विषयावर अधिक भाष्य टाळले. परंतु ईडीची चौकशी मागे लागू नये म्हणून अनेक शिवसेनेती आमदार, खासदार शिंदेसोबत जात असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ईडीचा कुठलाही दबाव कुणावरही नाही.

जे आमदार,खासदार आमच्यासोबत आले, त्यापैकी एकाने तरी असे सांगितले का, की ईडीचा दबाव होता म्हणून आम्ही शिवसेनेत किंवा भाजपमध्ये आलोय. मग हे आरोप कशासाठी, यानंतरही मी आवाहन करतो की ईडीचा दबाव आहे, किंवा कारवाईची भिता वाटते म्हणून जर कोणी शिवसेना किंवा भाजपमध्ये येत असेल तर कृपया येऊ नका, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. अर्जून खोतकरांना देखील मे हीच सांगितले असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com