ठाकरे सरकार मराठावाडा-विदर्भ विरोधी ; फडणवीसांचे टीकास्त्र

देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, ''महाविकास आघाडी सरकारने (thackeray government) विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाची हत्या करण्याचे काम केलं आहे.
devendra fadnavis
devendra fadnavissarkarnama

लातूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाड्याच्या( marathwada) दैाऱ्यावर आहेत. काल त्यांनी लातूर जिल्ह्यातील वांजरवाडा, हडोळती, घरणी, भातखेडा या पूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांना भेट दिली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड होते.

देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, ''महाविकास आघाडी सरकारने (thackeray government) स्थानिक विकास मंडळाची हत्या केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय मिळू शकला नाही. विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाची हत्या करण्याचे काम या सरकारला केलं आहे. वीज सवलत बंद केल्याने मोठ्या प्रमाणात शेती पंपाचे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायती, शाळा, घरांची वीज तोडण्याचे काम या सरकारनं केलं आहे,"

''सरकारनं विमा कंपन्यांना वटणीवर आणलं पाहिजे, आमच्या काळात आम्ही विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली. शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत केली नाही तर शेतकरी अडचणीत येईल. सरकार कुठेतरी कमी पडत आहे. या विषयात सरकारने तात्काळ लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचविणार,'' असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड होते

devendra fadnavis
ठाकरे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही

फडणवीसांनी यावेळी फुलवळ येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टी भागाचा दौरा करताना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कैफियत मांडताना शेतकऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सुद्धा गहिवरून आलं.

नांदेड जिल्ह्यातील फुलवळ येथील पिकांची पाहताना फडणवीसांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी फडणीस यांनी सरकारकडून मदत मिळवून देण्या बाबतचा धीर देत असताना एवढा पाऊस झाला की शेकडो हेक्टर खरडून गेली. पिकांसह शेतातील माती ही वाहून गेली गळ्यापर्यंत एवढे खड्डे पडले. रखडलेली जमिन दुरुस्तीसाठी ही काही तरी सरकारनं करावं, अस म्हणत शेतकऱ्याच्या भावना अनावर झाल्या. आपली व्यथा मांडत असताना शेतकऱ्यांना रडू कोसळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com