Sillod Farmers news : कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघातच एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी जीवन संपवलं

कांद्याचे दर गडगडल्यामुळे नाशिकच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने दीड एकरात पिकवलेल्या कांद्याची होळी केली आहे.
Sillod Farmers news :
Sillod Farmers news :Sarkarnama

Sillod Farmers news : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून काही तासांच्या अंतराने दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सिल्लोड येथील अंधारी गावात हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय - ४६ वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय - ५५ वर्षे) अशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भागिनाथ पांडव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे तीन एकर शेती होती. व्याजावर पैसे घेऊन कलिंगडाची शेती लावली. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने जमिनीतील ओलाव्यामुळे चांगले उत्पादन होईल अशी त्यांना अपेक्षा होती. पण झालं मात्र भलतचं. अपेक्षेप्रमाणे शेतीतून उत्पन्न मिळाले नही. त्यामुळे भागिनाथ टेन्शमध्ये होते. घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याची चिंता त्यांना सतावत होती. शेवटी या चिंतेतून त्यांनी शुक्रवारी (३ मार्च) त्यांनी शेडमध्ये गळफास घेत जीवन संपवले.

Sillod Farmers news :
Umesh Dange : मी शब्द दिला नव्हता, येण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असंच सांगितलं होतं !

भागिनाथ पांडव यांच्या आत्महत्येला काही तास उलटत नाहीत तोच गावातील दुसऱ्या शेतकऱ्याने म्हणजे जनार्दन तायडे यांनीदेखील आत्महत्या केल्याने संपूर्ण सिल्लोडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तायडे हे दुसऱ्याची जमीन कासायला घेतली होती. तायडे यांनादेखील अपेक्षेपेक्षा खूपच कमी उत्पन्न मिळाले होते. त्यातच आधीच डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि नापिकी या दुहेरी संकटामुळे तायडे नैराश्यात होते. अखेर त्यांनीदेखील झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या करत आयुष्य संपवलं. दोन्ही प्रकरणांचा पंचनामा करून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मृत शेतकऱ्यांच्या पार्थिवावर शनिवारी (४ मार्च) अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्यात शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच हे सरकार सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असल्याची वक्तव्ये करत असतात. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी ठोस उपयायोजन करण्याची आश्वासनेही दिली जातात. मात्र, त्याच सरकारमधल्या कृषीमंत्री असलेल्आ अब्दुल सत्तार यांच्याच सिल्लोड मतदार संघात एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विदारक वास्तव आहे.

त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर गडगडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल आहेत. शेकडो टन कांदा विकूनही त्याच्या मोबदल्यात फक्त हातात एक-दोन रुपये त्यांच्या हातात पडत आहेत. या सगळ्याला वैतागून नाशिकच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने दीड एकरात पिकवलेल्या कांद्याची होळी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com