'सोनिया गांधींना महाविकास आघाडीत सहभागी व्हायचे नव्हते, पण...'

Congress| Sonai Gandhi) बीड जिल्ह्यातील गेवराईत येथे रविवारी चौदाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शना दरम्यान नाना पटोले यांनी कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होण्याचे कारण सांगितले
Nana Patole
Nana Patole sarkarnama

बीड: ''काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सहभागी होण्यास तयार नव्हत्या. अनेर प्रयत्न केल्यानंतर त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होण्यास तयार झाल्या, असे वक्तव्य कॉंग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत अनेकदा मंत्र्यांमधील मतभेद आणि नाराजी समोर आली आहे. अशातच नाना पटोले यांनी केलेले हे धक्कादायक विधान पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला विषय ठरत आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराईत येथे रविवारी चौदाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते झाले. याठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. "कॉंग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होऊ नये, अशी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची इच्छा होती. पण केवळ भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आणि शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली, असे धक्कादायक विधान नाना पटोले यांनी केले आहे.

Nana Patole
...'ती' चूक सोनियांनी स्वीकारली! सिध्दूंसह पत्नी व मुलीवर फोडलं खापर

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याच्या उद्देशाने कॉंग्रेसने महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद नको; पण पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, अशी अट सोनिया गांधींनी घातली होती. याशिवाय शेतकर्‍यांची कर्जमाफी हा विषय आमच्याद़ृष्टीने प्राधान्याचा होता, असेही यावेळी पटोले यांनी सांगितले.

रविवारी मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दोन तासांच्या चौकशीबाबत नाना पटोले यांना पत्रकारांनी त्यांचे मत विचारले असता, नाना पटोले म्हणाले की, 'इतरांवर कारवाई झाली की हे लोक पेढे वाटतात. पण त्यांनाच चौकशीतून जावे लागते तेव्हा ते अडचणीत येतात. ही भाजपची जुनी संस्कृती आहे.

दरम्यान, 2024 च्या निवडणुकीत मोदी सरकार पायउतार होईल आणि काँग्रेसची सत्ता येईल. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे भाकित नाना पटोले यांनी रविवारी सोलापुरात केले. काँग्रेसतर्फे आयोजित संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com